आखाती प्रदेशातले सर्वात मोठे वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखले जाणारे सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातला इतर देशांकडून वाळू मागवावी लागत आहे. या देशांकडे वाळूचा कोणताही तुटवडा नसतात. मग या देशात बाहेर रेती आणायची गरज का पडली ? वास्तविक सौदी अरबचे भविष्यातील शहर युएई गगनाला भिडलेल्या इमारती आणि अब्जावधी डॉलरचे मेगा प्रोजेक्ट्स ज्या रेतीची गरज आहे , ती या वाळवंटातून भागत नाही.त्यामुळे या देशांना ऑस्ट्रेलियासारख्या दूरवरील देशातून रेती मागवण्याची वेळ आली आहे. चला तर पाहूयात काय नेमके प्रकरण
वाळवंटातील वाळूचे कण इतके सुक्ष्म असतात की ते सिमेंटसोबत नीट चिकटत नाहीत. त्यामुळे काँक्रीट कमजोर बनते. उंच इमारतीचे वजन पेलू शकत नाहीत. त्यामुळे उंची इमारती, पुल, मेट्रो आणि मोठ्या इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये खास प्रकारची वाळूचा वापर करणे गरजेचे असते.
ऑस्ट्रेलिया आज जगातला सर्वात मोठा बांधकामाची रेती निर्यात करणारा देश आहे. साल २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने सुमारे २७३ अब्ज डॉलरची रेती निर्यात केली होती. २०२३ मध्ये सौदी अरबने ऑस्ट्रेलियातून सुमारे १.४ लाख डॉलरची नैसर्गिक बांधकाम योग्य रेती खरेदी केली आहे. हा ट्रेंड साल २०२४ मध्येही सुरु राहिला. खास करुन जेव्हा सौदी अरबने त्यांच्याकडील मोठ्या प्रोजेक्टना गती दिली.
सौदी अरबचे व्हिजन २०३०, निओम सिटी, द लाईन, रेड सी प्रोजेक्ट आणि किद्दिया सारख्या प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर उच्च गुणवत्तेच्या काँक्रीटची मागणी असते. या प्रोजेस्ट्समध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड शक्य नसते. त्यामुळे परदेशातून रेती आयत करणे ही सौदी अरबची मजबूरी बनली आहे.
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफा यांच्या निर्मिती देखील स्थानिय वाळवंटाचील रेतीचा वापर केलेला नाही. या इमारतीला बांधायला कोट्यवधी लिटर काँक्रीट, हजारो टन स्टील आणि विशेष निर्मिती सामग्री लागली. ज्यात ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या रेतीचे महत्वाचे योगदान आहे.
केवळ सौदी अरबच नाही तर UAE आणि कतार देखील या समस्येचा सामना करत आहेत. दुबई आणि अबूधाबीची वेगाने बदलती स्कायलाईन, आर्टीफिशियल आयलँड्स आणि बीच प्रोजेक्ट्ससाठी मोठ्या प्रमाणावर समुद्री आणि परदेशी रेतीचा वापर केला गेला. पाम जुमैरा सारख्या प्रोजेक्ट्स स्थानिक रेती साहित्यावर मोठी दबाव होता.
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार दरवर्षी जगात सुमारे ५० अब्ज टन रेतीचा विक्री केली जाते. ही जगातील सर्वात जास्त जमीनीतून काढली जाणारी नैसर्गिक साधन संपत्ती बनली आहे. अनियंत्रित रेती उत्खननाने नद्यांचा प्रवाह, जैवविविधतेचे नुकसान आणि पर्याटनाची संकट गहिरे बनत चालले आहे. या वाढत्या संकटास पाहून अनेक देश मॅन्युफॅक्चर्ड सँड आणि बांधकाम निर्मिती कचऱ्याचा पुनर्वापर सारख्या पर्यायांवर काम करत आहेत. सौदी अरब देखील अशा पर्यायांवर अभ्यास करत आहे. त्यामुळे भविष्यात रेती संकटाचा सामना करता येईल.