Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं
esakal January 26, 2026 02:45 AM

भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी पूर्णपणे स्वतंत्र झाला असून ९९ वर्षांच्या लीज किंवा करारावर स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. '९९ वर्षांच्या लीज'चा हा प्रकार केवळ सोशल मीडियावरील अफवा असून त्याला कोणताही ऐतिहासिक किंवा कायदेशीर आधार नाही. ब्रिटीश संसदेने संमत केलेल्या 'भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७' (Indian Independence Act 1947) नुसार भारताला संपूर्ण सार्वभौमत्व बहाल करण्यात आले होते, ज्यामध्ये कोणत्याही कराराचा किंवा परत येण्याच्या अटीचा उल्लेख नाही.

BJYM (भारतीय जनता युवा मोर्चा) ची नेत्या असल्याचे सांगणाऱ्या रुची पाठक (Ruchi Pathak) यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्या दावा करताना दिसतात की, "भारत ९९ वर्षांच्या लीजवर स्वतंत्र झाला असून २०४६ मध्ये हा करार संपल्यावर इंग्रज पुन्हा भारतात येतील." मात्र, हा दावा पूर्णतः चुकीचा असल्याचे सिद्ध झाले असून स्वतः इतिहासकार आणि घटनातज्ज्ञांनी अशा प्रकारच्या कोणत्याही कराराचे अस्तित्व नाकारले आहे.

View this post on Instagram

A post shared by POLITICS LIVE (@politics_lives)