भारताने केलेल्या युरोपीय युनियन आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर पाकिस्तानला मोठा झटका बसला. पाकिस्तानच्या तणावात मोठी वाढ झाली. भारताच्या या करारांमुळे पाकिस्तानच्या कॉटन एक्सपोर्टला मोठा हादरला बसू शकतो. हेच नाही तर पाकिस्तानातून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वैश्विक बाजारात पाकिस्तानची स्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे. भारताने नुकताच मदर ऑफ डिल्सवर सह्या केल्या. हेच नाही तर अमेरिकेनेही भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला. कॉटन जिनर्स फोरमचे अध्यक्ष एहसानुल हक यांनी मोठी चेतावणी दिली आहे. सरकारने जर कॉटन उद्योगांबाबत लगेचच निर्णय घेतला नाही तर खूप मोठे नुकसान होऊ शकते. पाकिस्तानच्या वैश्विक बाजारावर याचा थेट परिणाम होऊ शकतो.
हक यांना चिंता आहे की, युरोपीय संघ आता भारताकडून उत्पादने निर्यात करेल. भारतावरील ड्यूटीने त्यांनी झिरो केली. भारतावरील मुळ टॅरिफ 25 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर अमेरिकेने केला. दंडात्मक 25 टक्के टॅरिफही लवकरच काढला जाईल. पाकिस्तानच्या उत्पादनावर 19 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारत असतानाच भारत आणि युरोपीय यूनियन यांच्यात मदर ऑफ ऑल डिल्स करार झाला. यामुळे भारतातून होणारी निर्यात थेट पद्धतीने वाढू शकते.
भारत ज्यापद्धतीने व्यापार करार अनेक देशांसोबत करत आहे आणि अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केला, त्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली. युरोपीयन युनियनसोबतही थेट करार झाला. या सर्व गोष्टींचा परिणाम पाकिस्तानवर थेट होणार आहे. कारण सध्याच्या परिस्थितीला भारताची वैश्विक बाजारात स्थिती चांगलीच मजबूत झाली आहे. पाकिस्तानमधून निर्यात होणाऱ्या अनेक गोष्टींवर परिणाम होईल.
युरोपियन युनियन जास्तीत जास्त वस्तू आता भारतातूनच निर्यात करणार याचा थेट फटका पाकिस्तान आणि पाकिस्तानातील व्यापाऱ्यांना बसणार हे स्पष्ट आहे. भारताच्या दोन निर्णयाने पाकिस्तानमध्ये सध्या चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. अमेरिका आणि भारतात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठा तणाव होता. शेवटी अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.