टीम इंडियाला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 हात करायचे आहेत. हा सामना 1 मार्चला होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा लागून आहे. अशात आता देशांतर्गत क्रिकेटमधून मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा याच्या जम्मू काश्मीर या टीमने इतिहास घडवला आहे. जम्मू काश्मीर टीम रणजी चॅम्पियन ठरली आहे. मात्र हा रोहित शर्मा टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार नाही. हा रोहित जम्मूचा गोलंदाज आहे. रोहित रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी जम्मू-काश्मीरच्या मुख्य संघात होता.