पाटबंधारे विभागाने शेतकऱ्याच्या हिताची निर्णय घ्यावेत. आमदार नारायण पाटील.
esakal March 05, 2026 02:45 PM

POT26B02172
पोथरे (ता. करमाळा) : मांगी प्रकल्पाच्या पाणी नियोजन बैठकीत बोलताना आमदार नारायण पाटील.

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या
हिताची निर्णय घ्यावेत : आमदार पाटील.
.........
पोथरे, ता. ४ : मांगी तलावाच्या पाण्यावर लाभधारक शेतकऱ्यांनी बागायती पिके केली आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शेतकऱ्यांना पाणी सोडण्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला नाही तर कुणाचीही गय केले जाणार नाही. शेतकऱ्यांनीही वेळेवर पाणीपट्टी भरून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही आमदार नारायण पाटील यांनी यावेळी केले आहे.
पोथरे येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, सोलापूर पाटबंधारे विभाग, पाटबंधारे उपविभाग करमाळा, व मांगी मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार होते. यावेळी व्यासपीठावर आमदार नारायण पाटील, पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, आदिनाथचे संचालक डॉ हरिदास केवारे, विठ्ठल सावंत आदी उपस्थित होते. यावेळी उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांनी तीन रोटेशन सोडण्याची मागणी केली. कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी पाच मार्चला उन्हाळी हंगामाचे पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अरुण कांबळे, संदीप पवार, अतुल दाभाडे, श्रीनिवास पुराणिक, वापर संस्थेचे सचिव ईश्वर पाटील, दादा शिंदे, बाळासाहेब ठोंबरे, सचिन वाघमोडे यांच्यासह मांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.