Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2026) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या विरोधात रोहित टिळक (Rohit Tilak) यांना रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत थेट पवार विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत.
शरद पवार यांच्या उमेदवारी अर्जावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. सुप्रिया सुळेंसोबतच संजय राऊत, जयंत पाटील, भास्कर जाधव, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, आदित्य ठाकरे हे अर्ज दाखल करताना गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेच्या वाट्याला एक जागा असली तरी शिंदे गटाने दोन उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे समोर आले आहे. सोलापूर येथील पक्षाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि रोहित टिळक, जे पुण्यातील काँग्रेसशी संबंधित असून लोकमान्य टिळकांचे पणतू आहेत. या दोघांनाही उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ते विधानभवनात दाखल होणार आहेत.
शिंदे गटाला दुसरी जागा जिंकण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज आहे. त्यामुळे सातव्या जागेसाठीची लढत अधिक रंगतदार ठरणार आहे. शरद पवार यांच्याविरोधात रोहित टिळक यांची उमेदवारी देऊन शिंदे गटाने मोठा राजकीय डाव टाकल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या 37 जागांसाठी देशभरात निवडणूक प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रातील ही लढत विशेष लक्षवेधी ठरत आहे. पुढील काही दिवसांत अंकगणित आणि राजकीय रणनीती यांचा कस लागणार आहे.
शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई)
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)
5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
6 मार्च – अर्जांची छाननी
9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी
कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित? (Rajyasabha Election 2026)
राज्यसभेच्या एकूण जागा : 7
राज्यसभेच्या एकूण जागा : 7
भाजपा : 136 (कर्डिले 1 वगळता)
शिवसेना : 56
राष्ट्रवादी : 40 (अजित पवार वगळता)
सहाव्या जागेची 36 मते वजा केली तरी 16 मते अतिरिक्त...म्हणजे सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मते अतिरिक्त आणावी लागतील.
उबाठा : 20
शरद पवार : 10
काँग्रेस : 16
(त्यामुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल तर दोन शक्यता: तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देणे, किंवा काँग्रेस आणि उबाठा हे दोनच पक्ष एकत्र आले तरी 36 असे काठावरचे बहुमत त्यांना लाभते)
आणखी वाचा