
भारताने टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव केला. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पहिले बॅटिंग करताना 253 धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात इंग्लंडला 254 धावाचा पाठलाग करताना 246 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियासाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. तर जेक बेथल याने 105 धावांची खेळी करुन इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र इंग्लंडचे प्रयत्न अवघ्या 7 धावांनी अपुरे पडले. भारताने अशाप्रकारे अंतिम फेरीत धडक दिली.