Money Scam : टोरेसनंतर दादरमध्ये आणखी एक घोटाळा, १५० जणांना कोट्यवधींना गंडवले, वाचा नेमकं प्रकरण काय?
Saam TV March 07, 2026 08:45 AM
  • दादरमधील निओग्रीन व्हेंचर कंपनीवर फसवणुकीचे आरोप

  • १५० गुंतवणूकदारांची सुमारे १० कोटी रुपयांची फसवणूक

  • ५० टक्के परताव्याचे आमिष दाखवून पैसे उकळले

  • शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार दाखल

Mumbai Dadar Kohinoor Square Neogreen Venture Company वर्षभरापूर्वी मुंबईतील नावाजलेल्या दादर परिसरातील टोरेस नावाच्या कंपनीने हजारो लोकांना कोट्यवधींचा गंडा घातला. याप्रकरणाची पायमुळे थेट परदेशात असल्याचे पाहायला मिळाले. ही घटना ताजी असतानाच दादरच्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये कार्यालय असलेल्या निओग्रीन व्हेंचर प्रा. लि. कंपनीने गुंतवणुकीच्या नावाने १५० जणांची १० कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक केली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आरती कौस्तुभ ठाकरे या कांदिवलीत नोकरीला आहेत. त्यांच्या पतीचा मित्र राहुल जोशी हा निओग्रीन कंपनीत सेल्स मॅनेजर होता. त्याने कौस्तुभ यांना कंपनीच्या गुंतवणूक योजनेबाबत माहिती दिली. पाच वर्षांसाठी कंपनीत पाच लाख रुपये गुंतवल्यास साडेबारा लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवले.

Gadchiroli : धक्कादायक! सरकारी रूग्णालयात ११ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबियांचा डॉक्टरांवर आरोप, गडचिरोलीत नेमकं काय झालं?

आरती आणि कौस्तुभ यांनी कंपनीच्या ऑफिसला भेट दिली. यावेळेस फडतरे आणि शेलार यांनी कंपनी मोरिंगा पावडरचे उत्पादन घेते, तो माल परदेशात एक्सपोर्ट केला जातो, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गुंतवणूकदारांना व्याज दिले जाते, असे सांगितले. फडतरे आणि शेलार यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ठाकरे दाम्पत्याने पाच वर्षांच्या गुंतवणुकीत ५० टक्के वार्षिक परतावा योजनेंतर्गत गुंतवणुकीसाठी होकार दिला. त्यानंतर त्यांनी सहा लाख रुपये गुंतवले. तर, आरती यांच्या आई दीपाली सापळे यांनी २ लाख गुंतवले. जानेवारी ते जुलै २०२३ या सात महिन्यांपर्यंत आरती यांना पावणेदोन लाख रुपये मिळाले.

Railway News : वेळ संपली, काम बंद! ड्युटी संपल्यानंतर लोको पायलटने ट्रेन थांबवली अन् निघून गेला, ३ तास प्रवाशांचा खोळंबा

त्यानंतर फडतरे व त्यांची कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करू लागली. वारंवार पाठपुरावा करून आरती यांनी काही रक्कम परत मिळवली. कंपनी संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्यांचे कॉल घेणे बंद केले. रक्कम न मिळाल्याने आरती यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये गुगलवर कंपनी फ्रॉड असल्याबाबत रिव्ह्यू दिला. त्यानंतर अनेक व्यक्तींनी देखील कंपनी ही फ्रॉड असल्याबाबत मत नोंदवले. या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी मुंबई पोलीस आता काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.