पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक आहे. यामध्ये माझी काहीही चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा, असा जबाब व्हीएसआर या विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग (V K Singh) यांनी दिला आहे. त्यांची सीआयडीकडून कसून चौकशी सध्या सुरू आहे. या अपघात प्रकरणी अजित पवारांचे (Ajit Pawar) पुतणे आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेक दावे केले आहेत, त्याचबरोबर सखोल चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे.(Ajit Pawar)
व्ही. के. सिंग (V K Singh) आणि रोहित सिंग यांची सीआयडीने तीन दिवस चौकशी केली आहे. मात्र, नेमके कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली. मात्र याबाबत सीआयडीकडून गुप्तता पाळण्यात आली आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरती आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत कंपनीतल्या त्रुटी आपल्या पत्रकार परिषदेतून समोर आणल्या आणि ही घटना हा घातपात असल्याचा आरोप केला आहे. व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांनी बारामती पोलिस ठाण्याबाहेर आंदोलनही केले होते. व्हीएसआर कंपनीबाबत अजित पवार यांचे पुत्र जय पवार हेदेखील आता आवाज उठवू लागले आहेत. अपघाताचा तपास सीआयडीकडे सोपविला आहे.
28 जानेवारी 2026 रोजी सकाळी मुंबईवरून बारामतीकडे जाणाऱ्या विमानाचा बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाला, यावेळी मोठा स्फोट होऊन विमान जळून खाक झालं, यावेळी विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूर होता. विमानात अजित पवार (Ajit Pawar), सह-पायलट शांभवी पाठक, सुरक्षा रक्षक विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी असे एकूण पाच जण होते. बारामती विमानतळावर विमान उतरण्याच्या प्रयत्नादरम्यान सकाळी पावणे नऊच्या सुमारात विमानाचा भीषण अपघात झाला झाला. विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सुमित कपूर त्या दिवशी विमान उडवण्यासाठी मूळ नियोजित पायलट नव्हता तर मूळ पायलट साहिल मदान ट्रॅफिकमध्ये अडकल्याने काही तास आधी सुमित कपूरला कॉल आला आणि त्याने अजित पवारांचं (Ajit Pawar) विमान बारामतीला घेऊन जाण्याची जबाबदारी घेतली होती. (V K Singh)