Latest Marathi Live Updates 10 march 2026 : पश्चिम आशिया हा आपल्या शेजारील प्रदेश आहे आणि तो स्थिर व शांत राहणे भारताच्या हिताचे आहे. तेथील संघर्षाचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. सर्व जोखीम लक्षात घेऊन केंद्र सरकार परिस्थिती हाताळत आहे,’ अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराण विरुद्ध अमेरिका-इस्राईल संघर्षावर संसदेत भारत सरकारची भूमिका मांडली. संघर्षग्रस्त आखातातून आतापर्यंत ६७ हजार भारतीय परतले असल्याचे ते म्हणाले. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...