मध्य पूर्वेत मोठा तणाव बघायला मिळत आहे. अमेरिकेने 2019 मध्ये इराणच्या एलपीजी गॅसवर काही निर्बंध घातले. या निर्बंधांनंतर भारताने इराणकडून एलपीजी गॅस आणि कच्चे तेल खरेदी करणे बंद केले. मात्र, इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात तेलाच्या किमती जागतिक मार्केटमध्ये गणणाला पोहोचल्या आहेत. या तेलाच्या वाढलेल्या किमतीवर नियंत्रण मिळवण्याकरिता अमेरिकेने इराणवर लादलेले निर्बंध काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत आणि इराण यांच्यात ऊर्जा व्यापार होत आहे. 2019 नंतर हे पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. यादरम्यान इराणचे तेलवाहू जहाज भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर काही वेळातच पोहोचेल. शिपिंग डेटाच्या रिपोर्टनुसार, ऑरोरा नावाचे प्रतिबंधित इराणी एलपीजी घेऊन निघाले आहे.
आज सायंकाळपर्यंत हे जहाज मंगलुरू बदरावर पोहोचण्याचे संकेत आहेत. मुळात म्हणजे हे जहाज भारतासाठी निघालेच नव्हते. हे एलपीजी घेऊन चीनच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, सध्याच्या बदललेली परिस्थिती बघता भारताच्या दिशेने जहाज निघाले. भारताने ट्रेडरच्या माध्यमातून जहाजामधील एलपीजी खरेदी केला आणि भारतीय रूपयांप्रमाणे त्याची खरेदी केली.
भारतात सध्याच्या घडीला एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. इराणकडून अगोदरच मोठी घोषणा करण्यात आली. होर्मुज खाडीतून भारताला सुरक्षित मार्ग दिला जात असल्याचे इराणने स्पष्ट केले. भारत हा आमचा मित्र देश असल्याने त्यांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देणार असल्याचे इराणकडून सांगण्यात आले. मात्र, असे असले तरीही भारताचे तब्बल 20 जहाज होर्मुज खाडीत अडकले आहेत. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही.
भारताने मोठी बाजी मारत चीनच्या दिशेने निघालेले इराणी एलपीजी गॅसचे जहाज आपल्याकडे वळवले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा फटका सर्वांनाच बसत आहे. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. भारत सरकारकडून एलपीजी गॅस भारतात कशाप्रकारे आणला जाईल, याकरिता विविध प्रकारेच प्रयत्न केले जात आहेत.