IPL 2026 Opening Ceremony : 19 व्या मोसमात ओपनिंग सेरेमनी होणार नाही! कारण…
Tv9 Marathi March 27, 2026 09:45 AM

IPL 2026 Opening Ceremony : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने या 19 व्या पर्वातील उर्वरित वेळापत्रक जाहीर केलंय. त्यामुळे या मोसमात एकूण किती सामने होणार? या प्रश्नाला पूर्णविराम मिळालं आहे. पहिल्या टप्प्यात 20 आणि दुसऱ्या टप्प्यात 50 असे एकूण 70 सामने 10 संघात 12 शहरात आयोजित करण्यात आले आहेत. प्रत्येक मोसमातील सलामीच्या सामन्याआधी रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अनेक कलाकार या कार्यक्रमात आपल्या कलाकृतीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे चाहत्यांना या रंगारंग कार्यक्रमाची प्रतिक्षा असते. मात्र यंदा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमासाधी ओपनिंग सेरमेनी होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

बंगळुरु चेंगराचेंगरी

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यंदा ओपनिंग सेरेमनी होणार नाहीय. बंगळुरुत गेल्या वर्षी आरसीबीच्या विजयी जल्लोषात 11 चाहत्यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा संवेदनशील असा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत बीसीसीआय किंवा आयपीएलकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आरसीबीने 2025 च्या आयपीएल फायनलमध्ये रजत पाटीदार याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला पराभूत करुन 18 वर्षांची ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा संपवली होती.

आरसीबीच्या या विजयाचं बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. स्टेडियममध्ये आरसीबीचे चॅम्पियन खेळाडूने उपस्थित होते. त्यामुळे चाहत्यांना आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जायचं होतं. मात्र स्टेडियम खचाखच भरल्याने चाहत्यांना गेटवर अडवण्यात आलं. मात्र चाहत्यांसमोर स्टेडियम प्रशानसाचं एक चाललं नाही. चाहते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे या चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यात चाहते सैरावैरा पळु लागले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात 11 जणांचा दुर्देवी शेवट झाला.

क्लोसिंग सेरेमनी केव्हा होणार?

तसेच या 19 व्या मोसमाची क्लोजिंग सेरेमनी केव्हा होणार? याबाबत टीओआयच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलं? जाणून घेऊयात. या हंगामातील अंतिम सामना हा 31 मे रोजी होईल. त्याआधी क्लोजिंग सेरेमनी होईल.

2019 साली रंगारंग कार्यक्रम रद्द

दरम्यान आयपीएल स्पर्धेतील रंगारंग कार्यक्रम रद्द करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार नाही. पुलवामा हल्ल्यात भारताने 40 जवान शहीद झाले होते. या 40 जवानांच्या स्मृतीत रंगारंग कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.