छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. मालिका टीआरपीमध्ये राहण्यासाठी मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट टाकण्यात येतात. असाच एक ट्विस्ट आता 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत येणार आहे. स्टार प्रवाहाची 'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. गेली तीन वर्ष ही मालिका टीआरपीमध्ये १ नंबरवर आहे. मात्र सतत तेच तेच दाखवून मालिका रटाळ झाल्याने आता प्रेक्षक तन्वीचं सत्य समोर आणण्याचा आग्रह करत आहेत. त्यामुळेच मालिकेत आता भलताच ट्विस्ट दाखवण्यात येणार आहे.
या मालिकेचा एक प्रोमो नुकताच समोर आलाय. त्यात सायली आणि प्रियामध्ये जोरदार भांडण होताना दाखवण्यात आलाय. सुभेदारांच्या सुना एकमेकींच्या झिंज्या उपटताना दिसत आहेत. सायली सुभेदाराची अतिशय शांत आणि गुणी सून आहे. मात्र ती चक्क प्रियासोबत भांडण करताना दिसतेय. ती नुसती भांडत नाहीये तर ती प्रियाचे केस पकडून तिला ओढतेय. त्यानंतर जेव्हा अर्जुन तिला विचारतो की तुम्ही असं का केलं तेव्हा ती म्हणते की आपल्याला तिची डीएनए टेस्ट करायला तिचे केस हवे होते आणि आता मला तिचे तीन तीन केस मिळालेत.
View this post on InstagramA post shared by Krushna Ramprasad Jagtap (Deshmukh) (@official_krushna_jagtap)
हा प्रोमो पाहून खरं तर प्रेक्षकांनी डोक्याला हात लावलाय. एकाने लिहिलं, 'तिच्या रूममध्ये गेले असते तर कंगव्याला किती केस मिळाले असते.३ केसांसाठी इतकं भांडण' आणखी एकाने लिहिलं, 'आता ती रिपोर्ट बदलणार.' आणखी एकाने लिहिलं, 'अर्जुन इतका मठ्ठ आहे की तो हे विसरून गेला की जेव्हा त्याला पहिल्यांदा प्रिया ही खरी तन्वी नाहीये ह्याचा संशय आला होता, तेव्हा त्याने तिच्या तळपायावर जन्म खूण आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रयत्न केला होता. आता त्याला हे confirm माहीत आहे की ही खरी तन्वी नाहीये, म्हणजेच तिच्या तळपायावरील जन्म खूण सुद्धा खोटी आहे. जर त्याने एकदाच असे सायलीला सांगितले असते की खऱ्या तन्वी च्या तळपायावर जन्म खूण आहे, तर इतका सगळा खटाटोप करण्याची गरज च उरली नसती.'
एकूणच काही प्रेक्षक या सीनची मजा घेतायत तर काही लेखक आणि अर्जुनाची अक्कल काढतायत. मात्र या सीननंतर मालिकेचा टीआरपी पुन्हा वाढणार हे नक्की.
डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर