मागील चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुणे, सोलापूर, हिंगोलीसह कोकण आणि मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतामधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडलाय. आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.