बॉलिवूडचे लोकप्रिय गायक, अभिनेते आणि गीतकार पियुष मिश्रा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. त्याचं कारण आहे त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र. पियुष यांच्या ‘तुम्हारी औकात क्या है, पीयूष मिश्रा’ या आत्मचरित्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष तर सांगितलंच आहे. सोबतच त्यांच्या चुकादेखील सांगितल्यात. त्यांच्या अफेअरबद्दल जेव्हा त्यांच्या पत्नीला समजलं होतं तेव्हा त्या त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया होती हे त्यांनी या पुस्तकात लिहिलंय.
पियुष मिश्रा यांच्या पुस्तकात ते म्हणतात, 'आता ते एक चांगले पती आहेत; पण आधी तसं नव्हतं. शुभंकर मिश्राशी संवाद साधताना ते म्हणाले, “आता मी एक चांगला पती आहे; पण पूर्वी तसा नव्हतो. तेव्हा मी अजिबात जबाबदार नव्हतो आणि लग्न ही खूप मोठी जबाबदारी असते. वयाच्या २० व्या वर्षी जेव्हा तुम्ही प्रेमात पडता, तेव्हा त्यात काहीच लॉजिक नसतं; पण वयाच्या ३५ नंतर तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम करता, जी तुमच्याबरोबर वृद्ध व्हायला तयार असते. माझ्या पत्नीने मला स्वीकारलं आणि माझ्याबरोबर आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला, हीच माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या आहे.'
View this post on InstagramA post shared by Piyush Mishra (@officialpiyushmishra)
ते म्हणाले, 'मी खूप उशिरा हे स्वीकारलं की, मी कोणाचा तरी पती आहे. ती माझी पत्नी आहे, याची जाणीव व्हायला मला तब्बल १० ते १५ वर्षं लागली. त्याआधी ती माझ्यासाठी फक्त माझ्या मुलांची आई आणि माझ्यासाठी स्वयंपाक करणारी व घर सांभाळणारी स्त्री होती. ती माझ्यावर प्रेम करत होती. तिनं घरातून पळून जाऊन, आई-वडिलांच्या विरोधात माझ्याशी लग्न केलं होतं. ती म्हणाली होती, ‘मी काहीही झालं तरी तुला सोडणार नाही. तू काहीही कर, पण मी तुला सोडणार नाही’.” पुढे पत्नीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, “ती माझ्याबरोबर राहिली हा तिचाच मोठेपणा होता. आमचं लग्न टिकवण्यामागे तिचाच मोठा वाटा आहे. याबद्दल मी खूप नशीबवान आहे.'
View this post on InstagramA post shared by Piyush Mishra (@officialpiyushmishra)
जेव्हा पियुष यांनी पत्नीला त्यांच्या अफेअर्सबद्दल सांगितलं तेव्हा त्यांची पत्नी काय म्हणाली याबद्दल सांगताना ते म्हणाले, 'जेव्हा मला माझ्या चुका समजल्या, तेव्हा मी एक दिवस तिला बसवून सगळं खरंखरं सांगितलं. आम्ही दोघंही रडलो आणि एकमेकांना मिठी मारली. ती म्हणाली, ‘तुझ्याकडून चुका झाल्या, माझ्याकडूनही झाल्या. तुझ्या जास्त, माझ्या कमी. आता इथेच सगळं संपवूया.’ त्यानंतर आमचं नातं अधिक घट्ट झालं. जर तिच्याकडून चुका झाल्या असत्या, तर मीदेखील तिला माफ केलं असतं. चुका फक्त एकाकडूनच होत नाहीत, त्यात माझाही कुठे तरी वाटा नक्कीच असता.'
ते पुढे म्हणाले, 'आम्हा दोघांनाही आयुष्यात सुधारणा करायची होती. प्रियादेखील संघर्ष करत होती आणि मीही. आम्ही दोघंही मानसिकदृष्ट्या कठीण काळातून जात होतो. काही गोष्टी एकमेकांना सांगायच्या होत्या; पण त्याची प्रतिक्रिया काय असेल याची भीती होती. सगळं उघडपणे बोलायला आम्हाला ५-६ वर्षे लागली. शेवटी एक दिवस आम्ही ठरवलं आणि सगळं सांगितलं. सुरुवातीला ते धक्का देणारं होतं; पण त्यानंतर आयुष्य खूप सुधारलं. लपवण्यासारखं काही उरलं नाही. त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो.' पीयूष मिश्रा यांनी १९९५ साली दिल्लीमध्ये आर्किटेक्ट प्रिया नारायणन यांच्याशी लग्न केलं. त्यांना जोश आणि जय अशी दोन मुलं आहेत.
लोकांना वाटायचं काय चाललं असेल... श्वेता शिंदेने सांगितली प्रसाद ओकसोबतच्या त्या हॉट सीन्सची आठवण, म्हणाली-