युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, इंधन संकट टळलं, समुद्रात पुन्हा मोठा खेळ
admin April 12, 2026 01:25 AM
[ad_1]
युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, इंधन संकट टळलं, समुद्रात पुन्हा मोठा खेळ

अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी युद्धविराम घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान सध्या पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिकेत वाटाघाटी सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार इराणने अमेरिकेसमोर एक अट ठेवली होती ती म्हणजे आखाती देशांमध्ये असलेली इराणची जी संपत्ती अमेरिकेनं जप्त केली आहे, ती मुक्त करावी आणि लेबनॉनवर सुरू असलेले हल्ले थांबावेत, मात्र अमेरिकेनं इराणची संपत्ती सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. युद्धविरामाची चर्चा पुढे जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे युद्धविरामाची घोषणा करतानाच अमेरिकेकडून इराणसमोर एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली होती, ती म्हणजे तातडीने स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी सुरू करावा.

मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर देखील इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंदच ठेवला आहे.दिवसभरात या मार्गाने फक्त 15 जहाजं जातील असं इराणच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे अजूनही जगावरचं इंधन संकट कायम आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामावर वाटाघाटी सुरू असतानाच आता भारतासाठी एक गूड न्यूज समोर आली आहे, ती म्हणजे भारताच्या आणखी एका जहाजानं स्ट्रीट ऑफ होर्मूज पार केलं आहे. भारताच्या जग विक्रम नावाच्या जहाजनं होर्मूजची सामुद्रधुनी पार केली आहे.

हे जाहाज एलपीजी गॅस घेऊन भारताच्या दिशेनं निघालं आहे. युद्धविरामानंतर स्ट्रीट ऑफ होर्मूज पार करणारं हे पहिलं भारतीय जहाज आहे. या जहाजानं शुक्रवारी मध्यरात्री होर्मूजची सामुद्रधुनी पार केली आहे. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यानंतर स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून बाहेर पडणारं हे भारताचं 9 वं जहाज आहे. मात्र अजूनही 15 जहाजं याच मार्गावर अडकून पडले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हे जहाज तब्बल वीस हजार टन एलपीजी घेऊन भारताच्या दिशेनं येत आहे. या जहाजाची एलपीजी वहन करण्याची एकूण क्षमता 26000 टन एवढी आहे. यामुळे आता भारताला काही प्रमाणात का होत नाही दिलासा मिळणार आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.