संकटात दिलासादायक बातमी! 53 लाख LPG सिलेंडर वितरीत, पुरवठा साखळी होणार सुरळीत
Marathi April 19, 2026 11:25 PM

एलपीजी सिलेंडर बातम्या : पश्चिम आशियात तणावाची स्थिती असल्यामुळं काही भागात गॅस (एलपीजी सिलेंडर) पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. भारतातील (India) लपीजी पुरवठा सामान्य आहे. वाहनांसाठीच्या एलपीजीची मागणी (LPG Demand) वाढली आहे, विमानसेवा सुरु आहे, त्यामुळं सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसत आहे.

भारतातील एलपीजी पुरवठा सामान्य

पश्चिम आशियातील तणाव सुरू असूनही, भारतातील एलपीजी पुरवठा सामान्य आहे. ताज्या आकडेवारीनुसार, एका दिवसात 53.5 लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलिंडर वितरित करण्यात आले, जे बुकिंगच्या तुलनेत सामान्य पातळीवर आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सामान्य ग्राहकांना सध्या गॅसच्या तुटवड्याचा सामना करावा लागत नाही.

या कालावधीत, 39000 हून अधिक पीएनजी ग्राहकांनी MYPNGD.in पोर्टलद्वारे आपली एलपीजी कनेक्शन्स परत केली. पाईपद्वारे गॅस पुरवठ्याच्या उपलब्धतेमुळे लोकांचे सिलिंडरवरील अवलंबित्व कमी होत असल्याचे मानले जाते.

ऑटो एलपीजीच्या मागणीत मोठी वाढ

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांची ऑटो एलपीजी विक्री एप्रिल 2026 मध्ये (17 एप्रिलपर्यंत) सरासरी 305 मेट्रिक टन प्रतिदिन इतकी झाली आहे, जी फेब्रुवारी 2026 मधील 177 मेट्रिक टन प्रतिदिन विक्रीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. यावरून ऑटो क्षेत्रात एलपीजीच्या मागणीत वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येते.

देश गरिमा टँकर सुरक्षित

भारतीय ध्वज असलेला कच्च्या तेलाचा टँकर ‘देश गरिमा’ होर्मुझच्या महत्त्वपूर्ण सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पार झाला आहे. 31 भारतीय खलाशांना घेऊन जाणारा हा टँकर 22 एप्रिल 2026 रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. ही भारतासाठी एक स्वागतार्ह बातमी आहे, कारण हा मार्ग जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

भारताकडून चिंता व्यक्त

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने इराणच्या राजदूतांना बोलावून या विषयावर तीव्र चिंता व्यक्त केली असून सुरक्षेची हमी मागितली आहे.

विमान प्रवास सुरु

तणाव असूनही, ज्या देशांची हवाई हद्द खुली आहे, तेथून विमानसेवा सुरू आहे. 28 फेब्रुवारीपासून या प्रदेशातून अंदाजे 10.97 लाख प्रवासी भारतात दाखल झाले आहेत, यावरून असे दिसून येते की हवाई संपर्क व्यवस्थेवर अद्याप कोणताही मोठा परिणाम झालेला नाही.

एकूण परिस्थिती नियंत्रणात

सध्याच्या परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक बाब ही आहे की ऊर्जा पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेवर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही. तथापि, सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.