मुलांना दिलेली संपत्ती नेहमीच त्यांच्या नावाने ओळखली जाते का ? जिथे संपत्ती, विश्वास आणि संबंधातून वाद होतो, त्या कुटुंबांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे.(All Image Credit- Canva)
आई-वडील नेहमी आपल्या मुलांवर, आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीवर आणि घरावर विश्वास ठेवतात. हे सर्व ते आपल्या मुलांच्या नावावर करतात. आपी मुलं म्हातारपणी आपली साथ देतील, असं त्यांना वाटतं. पण खेदाची गोष्ट ही आहे की, कधीकधी घर नावावर झाल्यावर, संपत्ती मिळाल्यावर मुलांचं वागणं बदलतं.
आईवडिलांची देखभाल करण्याच्या अटीवर मुलांना संपत्ती देण्यात आली होती. जर कोणी याचं पालन नाही केलं तर ही संपूर्ण प्रक्रिया रद्द कण्यात येईल आणि आईवडिलांना परत त्यांची संपत्ती मिळेल, असं कोर्टाने म्हटलं.
मेटेनन्स अँड वेलफेअर तसेच पॅरेंट्स अँड सीनियर सीटिझन ॲक्ट 2007 नुसार, मुलं किंवा इतर वारसदार पालकांची नीट, योग्य ती काळजी घेत नसतील, तर त्यांना दिलेली मालमत्ता परत घेतली जाऊ शकते.
मालमत्ता परत मिळवण्यासाठी, तुम्ही ज्येष्ठ नागरिक न्यायालयात अर्ज दाखल करू शकता. न्यायालय मालमत्तेचे हस्तांतरण रद्द करून, ती पालकांना परत केली जाऊ शकते. ( डिस्क्लेमर : जर तुमची एखादी विशिष्ट केस असेल, तर कायदेतज्ज्ञाचा सल्ला घेणं उचित ठरेल. येथे दिलेली माहिती केवळ न्यायालयाच्या निर्णयांवर आणि कलमांवर आधारित आहे. तुमच्या केससाठी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक असल्यास, तुम्ही योग्य वकिलाचा सल्ला घेऊ शकता.)