लग्नाच्या मंडपात एकीकडे मंत्रोच्चार होत असतात तर दुसरीकडे सर्व पाहुण्यांचे एकाच गोष्टीकडे लक्ष असते. जेव्हा नवरदेव नवरीला कुंकू लावतो तो क्षण प्रत्येकालाच पाहायचा असतो. नवरीसाठी हा एक भावनिक क्षण असतो. त्या क्षणापासून वधू आणि वर एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचं वचन देतात.
परंतु अनेकदा कुंकू लावता ते अचानक नवरीच्या नाकावर किंवा कपाळावर कुठेतरी लागते. याचा अनेकजण वेगवेगळा अर्थ लावतात. नवरदेव नवरीला कुंकू लावताना तेच कुंकू जर नाकावर पडले तर ते शुभ मानले जाते. याबाबत नेमकी काय मान्यता आहे ते जाणून घेऊ या…
नवरदेव नवरीला कुंकू लावताना तेच कुंकू नाकावर सांडले तर तो एक शुभ संकेत मानला जातो. नवरी आणि नवरदेवाचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, असा अर्थ यातून काढला जातो. जेव्हा लग्नमंडपात कुंकू नवरीच्या नाकावर पडते तेव्हा भविष्यात या दोघांचे नाते आणखी दृढ होणार आहे, असे मानले जाते.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.