इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी युद्धाचा आखाडा बनली आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढताना दिसत आहे. एकीकडे संपूर्ण जग प्रार्थना करत आहे की, होर्मुज खाडी सुरक्षित व्हावी. पण सध्याच्या घडीला सर्वकाही उलटे होताना दिसत आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीनंतर इराण काही दिवस शांत होता. चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता होती. मात्र, नाकेबंदी कायम ठेवण्याची भूमिका अमेकिने घेतली. या नाकेबंदीमुळे इराणला मोठा नुकसान सहन करावे लागत आहे. त्यांच्या बंदरातून एकही जहाज बाहेर येऊ शकत नाहीये. जगाला ज्याची भीती तेच आता होर्मुज खाडीत घडत आहे. काही दिवस शांत बसल्यानंतर इराण आक्रमक भूमिकेत होर्मुज खाडीत बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीत 18 एप्रिल रोजी एका भारतीय जहाजावर गोळीबार झाला. त्यानंतर भारताने मोठा इशारा दिला. आता पुन्हा एकदा होर्मुजमध्ये वातावरण ताईट झाल्याचे बघायला मिळत आहे.
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुज खाडीत पुन्हा एकदा एका जहाजावर मोठा हल्ला झाला. यावेळी इराणी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सकडून एका जहाजावर गोळीबार करण्यात आला. जहाजाच्या नियंत्रण कक्षाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. होर्मुज खाडीत तणाव यामुळे अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. परिस्थिती अधिक चिघळली आहे.
होर्मुज खाडीत भारतासह अनेक देशांचे जहाज अडकले आहेत. होर्मुज खाडीत कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. प्रत्येक देश होर्मुज खाडीत अडकलेल्या आपल्या जहाजांविषयी चिंतेत आहे. यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सने ओमानजवळ एका जहाजासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. माहितीनुसार, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सची एक गनबोट जहाजाजवळ आली.
त्यावेळी त्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले. या गोळीबारानंतर जहाजाला आग वगैरे न लागल्याची माहिती मिळत आहे. जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनेनंतर तणाव अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीत परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष सध्याच्या घडीला होर्मुज खाडीकडे लागले आहे.