मोठी बातमी समोर येत आहे. आज पश्चिम बंगाल विधानसभेसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान होताच आता 5 ही राज्याचे एक्झिट पोल हाती आले आहेत. मॅट्रिझच्या एक्झिटपोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपला 146 ते 161 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर तृणमुल काँग्रेसला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ असा की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप मॅजिक फिगर गाठेल असा अंदाज आहे. तर या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येताना दिसत आहे.
चाणक्यचा एक्झिट पोल देखील आता समोर आला आहे. चाणक्याच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 130 – 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर पोल डायरीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला अवघ्या 99 ते 127 जागंवरच समाधान मानावं लागणार आहे. तर भाजपला 142 ते 171 जागा मिळण्याचा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आसाममध्ये काय स्थिती?
आसाममध्ये पुन्हा एकदा एनीडीएची सत्ता येताना दिसत आहे. एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर काँग्रेसला 24 ते 36 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. याचा अर्थ एक्झिट पोलच्या अंदानुसार भाजप पुन्हा एकदा आसाममध्ये आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार आहे.