पाकिस्तानने केले थेट भारताचे तोंडभरून काैतुक, भारताकडे बघा म्हणत थेट..
GH News May 01, 2026 01:11 PM

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. पाकिस्तानची वाट लागली आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. होर्मुज खाडी बंद आहे. कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे पण भारताने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णय घेतला. होर्मुज खाडी आता दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून ठप्प आहे. कच्च्या तेलाचे जहाज ये जा करू शकत नाहीत. ऊर्जेचे मोठे संकट उभे आहे. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनही स्थिती आहे. कच्च्या तेलाचा साठा त्यांचा जवळपास संपला आहे. यादरम्यान भारतातील परिस्थिती आणि पाकिस्तानातील परिस्थिती बघून चक्क पाकिस्तानच्या मंत्र्याने भारताचे काैतुक केले. होर्मुज खाडीतील परिस्थितीमध्येही भारत किती जास्त मजबूत स्थितीत आहे म्हणत त्यांनी भारताचे काैतुक केले.

पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री, अली परवेझ मलिक यांनी भारताचे काैतुक केले. भारताबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, चांगल्या प्रमाणात तेल आणि डॉलरच्या साठ्यांमुळे नवी दिल्लीवर संकटाचा फार काही परिणाम दिसत नाहीये. विशेष म्हणजे त्यांचे हे विधान अशावेळी आले, त्यावेळी पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. शिवाय पाकिस्तानमध्ये महागाईने देखील मोठा कहर केला.

सध्याच्या परिस्थितीमुळे शहबाज शरीफ यांचे सरकारही प्रचंड दबावाखाली आहे. पाकिस्तान सरकारकडून अनेक प्रयत्न ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केले जात आहेत. मात्र, संकट अधिक वाढत आहे. पाकिस्तानची पूर्णपणे वाट लागली. खाण्यापिण्याचेही वांदे आहेत. मात्र, आपल्या देशातील परिस्थिती नियंत्रणात आणायची सोडून पाकिस्तान मात्र इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्यात अधिक बिझी आहे.

भारतातही या युद्धचा परिणाम दिसत आहे. भारतात एलपीजी गॅसचे संकट आहे. तुटवडा निर्माण झाला. मात्र, यातून सरकार मार्ग काढत आहे. पाकिस्तानसह बांगलादेशाची वाट लागली आहे. भारताने या वाईट काळात बांगलादेशाची मदत केली. पाकिस्तानच्या मदतीकरिता एकदी देश पुढे येत नाही. विशेष म्हणजे होर्मुज खाडी बंद असतानाही भारतात कच्चे तेल आणि एलपीजी गॅस दाखल होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.