Chanakya Niti : आई-वडील, नवरा बायको कोणासोबतच कधी तुमचं नातं खराब होणार नाही; फक्त चाणक्यांच्या या गोष्टी लक्ष ठेवा बस…
Tv9 Marathi May 04, 2026 12:45 AM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणसाच्या आयुष्यात पैशांचं प्रचंड महत्त्व असतं. तुम्ही पैशाने जगातील प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकतात. त्यामुळेच माणूस आयुष्यभर पैशांमागे पळत असतो. आपल्याकडे खूप पैसा असावा यासाठी तो दिवस-रात्र मेहनत करतो. आपलं संपूर्ण आयुष्य पैसा कमावण्यात खर्च करतो. मात्र त्याच्या मृत्यूनंतर तो एकही पैसा सोबत घेऊन जाऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही पैसा कमावण्यामध्ये व्यस्त होतात, तेव्हा तुमचं तुमच्या नातेवाईकांकडे दुर्लक्ष होतं. तुम्ही तुमचे आई-वडील, बहीण आणि बायको, मुलगा अशा तुमच्यासाठी अत्यंत जवळच्या असलेल्या लोकांपासून देखील दुरावतात, याचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर होत असतो, तुम्ही प्रचंड एकटं पडतात. त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यात पैसा हा कमावलाच पाहिजे, परंतु पैसा कमावत असताना तुम्ही तुमचे नातेसंबंध देखील जपले पाहिजेत, तुम्ही तुमचा मित्र परिवार देखील वाढवला पाहिजे. कारण तुमच्या मृत्यूनंतर याचमुळे तुमची आठवण काढली जाते. जर तुम्ही आयुष्यभर फक्त पैसाच कमावत राहिलात तर हे जग तुम्हाला कधीही लक्षात ठेवणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

विश्वास – चाणक्य म्हणतात कोणत्याही नात्याची खरी ताकद ही विश्वासच असते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवता तेव्हा तो व्यक्ती तुम्हाला आपोआप आपला वाटू लागतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या मनातील अशा काही गोष्टी ज्या तुम्ही आतापर्यंत कोणालाच सांगितलेल्या नाहीत त्या गोष्टी तुम्ही या व्यक्तीला सांगतात. तुम्ही तुमचं मन अशा व्यक्तीकडे मोकळं करतात, त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळते.

प्रेम – चाणक्य म्हणतात आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी नातं कोणतंही असू द्या, त्यामध्ये प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा हवा. तर आणि तरच तुमचं नातं टिकू शकतं. एखाद्या नात्यात जेव्हा प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा येतो, ते नातं कधीच खराब होऊ शकत नाही. असं नातं आयुष्यभर टिकतं. असं चाणक्य यानी म्हटलं आहे.

आदर – चाणक्य म्हणतात जशी नात्यामध्ये विश्वास आणि प्रेमाची गरज असते, तसाच नात्यामध्ये आदर देखील महत्त्वाचा असतो. जर तुम्ही समरोच्या व्यक्तीचा आदर कराल तर तो व्यक्ती देखील तुमचा आदर करतो, ज्या नात्यात आदर आहे, असं नातं आयुष्यात कधी खराब होत नाही. लक्षात ठेवा आयुष्य जगण्यासाठी जेवढा पैसा महत्त्वाचा आहे, तेवढेच महत्त्वाचे नातेवाईक देखील असतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.