Assam Election Result 2026 : आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल आता काही तासांवर आला असून सोमवारी होणाऱ्या मतमोजणीत राज्यातील सत्तेचा अंतिम निर्णय होणार आहे. सत्ताधारी एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार की काँग्रेस सत्तांतर घडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बहुतेक एग्जिट पोल्सनी एनडीएला स्पष्ट आघाडी दिली असली, तरी प्रत्यक्ष निकालात काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आसाममधील 126 विधानसभा जागांसाठी एकूण 722 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. राज्यातील 35 जिल्ह्यांमधील 40 मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी पार पडणार आहे. मतदान 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात पार पडले होते. यात सुमारे 85.96 टक्के मतदान झाले होते, जे मोठ्या प्रमाणावर निर्णायक मानले जात आहे.
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते मैदानात असून त्यांच्यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे:
एनडीएमध्ये भाजपसोबत असम गण परिषद (AGP) आणि इतर सहयोगी पक्ष आहेत. अतुल बोरा यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची मानली जाते. दुसरीकडे काँग्रेसने बेरोजगारी, महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर आक्रमक प्रचार केला.
या निवडणुकीत आसामिया, बंगाली भाषिक, मुस्लिम, चहा बागेतील कामगार आणि आदिवासी समाज अशा विविध गटांचा मतदानावर मोठा प्रभाव राहिला आहे. राज्यातील ओळख राजकारण, कल्याणकारी योजना आणि प्रादेशिक आकांक्षा हे या निवडणुकीतील मुख्य मुद्दे ठरले.
मतमोजणीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (CAPF) 25 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच 800 हून अधिक पोलिस कर्मचारी ईव्हीएम सुरक्षितपणे हलवण्यासाठी तैनात असणार आहेत. कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी 85 विशेष ‘असॉल्ट ग्रुप्स’ सज्ज ठेवण्यात आले आहेत.
2021 च्या निवडणुकीत एनडीएला 76 जागा, यूपीएला 49 जागा आणि इतरांना 1 जागा मिळाली होती. यावेळी एनडीए हॅटट्रिक साधणार की काँग्रेस सत्ता हस्तगत करणार, याचा फैसला उद्याच्या निकालात होणार आहे.
ही बातमी वाचा: