बारामती पोटनिवडणुकीतील प्रचंड विजयानंतर सुनेत्रा पवार यांचे राजकीय स्थान झपाट्याने उंचावत आहे. २०२९ मध्ये त्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील या पुत्र जय पवार यांच्या वक्तव्यामुळे राज्य राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
ALSO READ: अशोक खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, भोंदू बाबाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरून जय निवडणूक लढवणार का, असे बारामतीमध्ये पत्रकारांनी विचारले असता, जय यांनी स्पष्ट केले की ते सध्या खासदार म्हणून निवडणूक लढवणार नाहीत. ते म्हणाले, "माझे पहिले प्राधान्य बारामतीला आहे आणि मी येथील लोकांसाठी काम करत राहीन."ALSO READ: मोबाईल पासवर्डच्या वादावरून गदारोळ, कॅबिनेट मंत्र्यांचे ओएसडी विजय कारंडे यांच्या विरोधात पुण्यात एफआयआर दाखल
Edited By- Dhanashri Naik