केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र आता पक्षासमोर मुख्यमंत्री निवडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसला तीन प्रमुख नेत्यांपैकी एकाची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करायची आहे, पण अद्याप कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. यासाठी आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्यात महत्त्वाची बैठक झाली मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाच्या नावावर एकमत झालेले नाही.
लवकरच मुंख्यमंत्री ठरणारदिल्लीतील बैठकीनंतर काँग्रेस नेत्या दीपा दास मुंशी यांनी सांगितले की मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. मात्र नेमकी तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. 23 मे ही केरळमध्ये सरकार स्थापनेची अंतिम मुदत आहे. त्याआधी नवीन सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आघाडीतील तीनही पक्ष आपापल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवू इच्छित असल्याने काँग्रेसमध्ये काही प्रमाणात असंतोषही दिसून येत आहे.
तीनही पक्षांचा मुख्यमंत्रीपदावर दावा(UDF) ला केरळ विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत दिले आहे. मात्र आता मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणे काँग्रेससाठी कठीण ठरत आहे, कारण आघाडीत तीन प्रमुख गट असून प्रत्येक गट आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी मागणी करत आहे. काँग्रेसकडे स्वतःचे वरिष्ठ नेते आहेत. दुसरीकडे CPI(M) कडेही स्वतःचा नेता आहे. तसेच केरळ काँग्रेसचाही स्वतंत्र नेता आहे. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्यालाच मुख्यमंत्री बनवण्याच्या प्रयत्नात असल्याने निर्णय प्रक्रियेत गुंतागुंत वाढली आहे.
महत्त्वाची बैठकआज केरळमधील मुख्यमंत्री निवडण्यासाठी मल्लिकार्जून खर्गे यांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह केरळमधील वरिष्ठ नेते रमेश चेन्नीथला, व्ही डी सतीषन, आणि केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ उपस्थित होते. ही बैठक तीन तासांहून अधिक काळ चालली. मुख्यमंत्रीपदासाठी कोण योग्य ठरेल यावर सर्वांनी आपली मते मांडली. मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम झालेले नाही.