माता रमाबाई आंबेडकर नगरात संयुक्त जयंतीनिमित्त विविध उपक्रम
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः घाटकोपरच्या माता रमाबाई आंबेडकरनगरात ऋणानुबंध अभियान आणि शहीद स्मारक समितीच्या वतीने भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन त्यांना शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे सांगण्यात आले. लेखक जगदीश ओहोळ यांचे व्याख्यान झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेताना किती अडचणी आल्या, त्या त्यांनी कशा सोडवल्या, याबाबतचे विश्लेषण केले. शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याबाबत बोलताना त्यांनी आपल्या गरजा कमी कराव्यात, मात्र शिक्षण घ्यावे, असे सांगितले. या वेळी शहीद स्मारक समितीचे पदाधिकारी काका गांगुर्डे, अशोक हिरे, मंगेश पगारे आदी उपस्थित होते.