पोलिसांवर दगड फेकणं महागात पडणार… 8 पकडले, इतरांचा शोध सुरू; वांद्रे झोपडपट्टी पाडकाम प्रकरणी मोठी कारवाई
Tv9 Marathi May 20, 2026 11:45 PM

मुंबईमधील वांद्रे येथे असलेल्या गरीब नगरमधील अतिक्रमण हटवण्याची मोहीम आज पश्चिम रेल्वेकडून हाती घेण्यात आली आहे. मात्र यावेळी स्थानिक लोक चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पथकाला विरोध केला. त्यामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ निर्माण झाला. स्थानिकांनी आधी पोलिसांवर बाटल्या फेकल्या स्थानिकांकडून बाटल्या फेकण्यात आल्यानं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आधी सौम्य लाठीचार्ज केला. मात्र त्यानंतर स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्यानं पोलिसांकडून पुन्हा लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान या घटनेत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

आठ जण ताब्यात 

दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना तिथे उपस्थित पोलिसांवर स्थानिकांनी दगडफेक केली आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकरणात आता पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे, तर या दगडफेकीमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध सुरू आहे.  या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

किरीट सोमय्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात दाखल 

दरम्यान या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निर्मल नगर पोलीस ठाण्याला भेट दिली आहे,  त्यांनी पोलीस उपायुक्त निमित्त गोयल यांच्या सोबत मोबाईल फोनवरून चर्चा केली. या घटनेसंदर्भात माहिती घेतली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

वांद्रा मधील ज्या भागातील अतिक्रमण हटवण्यात येत आहे, ती जागा पश्चिम रेल्वेची आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पश्चिम रेल्वेकडून हे अतिक्रमण हटवण्यात येत आहे. अतिक्रम हटाव मोहिमेदरम्यान स्थानिकांनी पोलिसांवर आधी बाटल्या फेकल्या त्यानंतर दगडफेक देखील करण्यात आली, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांनी देखील लाठीचार्ज केला. या प्रकरणात दगडफेक करणारे 8 जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर इतर लोकांचा शोध सुरू आहे. या ठिकाणी जवळपास 1200 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.