बीसीसीआय निवड समितीने 6 जून रोजी आगामी एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर तिलक वर्मा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. तसेच निवड समितीने भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या स्पर्धेसाठी संधी दिली आहे. सोबतच 15 वर्षांचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचीही निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
जसप्रीत बुमराहचा समावेशबीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी जसप्रीत बुमराहचा समावेश केलेला नाही. मात्र बुमराहला एशियन गेम्ससाठी बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बुमराह आता थेट एशियन गेम्स स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे बुमराह या महत्त्वाच्या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऋतुराज गायकवाडला डच्चूटीम इंडिया या स्पर्धेतील गतविजेता आहे. ऋतुराज गायकवाड याने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला 2023 साली विजयी केलं होतं. टीम इंडियाने तेव्हा अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्यामुळे टीम इंडियासमोर यंदा सुवर्ण पदक कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे.
एशियन गेम्स स्पर्धा आणि टीम इंडियाचे खेळाडू
स्पर्धेला केव्हापासून सुरुवात?Here’s a look at #TeamIndia‘s squad for the Asian Games 2026 in Japan this September 👏#AsianGames pic.twitter.com/euMfmhWEcN
— BCCI (@BCCI) June 6, 2026
दरम्यान एशियन गेम्स स्पर्धेचं 17 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या 10 संघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, जपान, मलेशिया, हाँगकाँग आणि ओमानचा समावेश आहे.
एशियन गेम्ससाठी टीम इंडिया : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह.
2 मल्टी डे मॅचसाठी संघ जाहीरतसेच बीसीसीआयने श्रीलंका ए विरुद्धच्या 2 मल्डी डे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार ध्रुव जुरेल हा इंडिया ए टीमचं नेतृत्व करणार आहे. देवदत्त पडीक्कल उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.