अलीकडच्या काळात वैवाहिक संबंधांमधील दरी प्रचंड वाढल्याने अशा प्रकरणांत हिंसा निर्माण वैवाहिक संबंधांमधील विश्वास आणि प्रेम या मुल्यांचा पराभव होतो. अशीच एक मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील करंजीमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका पतीने पत्नीच्या चारित्र्याबद्दलच्या संशयावरून क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. या घटनेने सर्वांना धक्का बसला असून नात्यांच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संशयाने सारे उद्ध्वस्त
घटना करंजी येथील रहिवासी तारा सारथी यांच्यासोबत घडली. ताराने २००६ मध्ये जितेंद्र नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. सुरुवातीला त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते आणि त्यांना चार मुले होती. मात्र, काही काळापासून त्यांच्या नात्यात कटुता आली होती आणि ते वेगळे राहत होते. जितेंद्रने तारावर इतर नातेवाईकांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला, तर ताराने आपल्या पतीवर दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध असल्याचा आरोप केला.
पीडितेसाठी न्यायाची मागणी