Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना, त्यापूर्वीच संजय राऊतांनी केला मोठा दावा; ओमराजे परत…
GH News June 21, 2026 02:12 PM

ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला पुन्हा मोठे खिंडार पाडले. 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला आहे. तर फुटीर खासदारांनी व्हिप झुगारला. ते पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले. बंडखोर खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण त्यांचे वडील, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे ओमराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान , शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला.

काय म्हणाले ओमराजे निंबाळकरांविषयी?

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना सोडली किंवा सोडतोय असं म्हटलं नाही. मी अद्याप शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला नाही, तर माझ्याविषयी या बातम्या का होतात असं ते म्हणाले. वडिलांच्या खटल्यात व्यस्त होतो, असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे वक्तव्य करता आलं नाही असं सांगितलं. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर त्यांच्याशी चर्चा करायला काही हरकत नाही. असे अजूनही खासदार आहे, त्यांच्याशी चर्चा करायला हरकत नाही.

पुढे ते म्हणाले की, प्रत्येकाचा विषय पैसा आणि निधी येतो. निधी हे फुटण्याचं कारण नाही. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस फुटले असते. मी विरोधी पक्षात आहे, हे माहीत असताना आणि संघर्ष आहे माहीत असताना उमेदवारी मागायला येता. लढण्याची भाषा करता. निवडून आल्यावर सत्तेची उब हवी असती. विरोधी पक्षात काम करणं ही सन्माची गोष्ट आहे. पण त्यांना २०० कोटींचा निधी, ५०० कोटींचा निधीची अमिष दाखवली जात आहे. २५ टक्के आणि ५० टक्क्याचं अमिष मिळतं. त्यात मोहात खासदार अडकत आहे.

बंडखोर खासदार आमच्या संपर्कात

बंडखोर खासदारांविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, हे खासदार तांत्रिकदृष्ट्या आजही शिवसेनेत आहे. ओम बिर्ला यांच्याकडून कोणतेही अधिकृत निर्देश नाही. ज्या गटात जाणार आहे, असं सांगितलं जात आहे, त्या मिंधे गटाने चार पाच खासदार येणार हे विधान आलं नाही. शिवसेना सोडली असं या खासदारांनी जाहीर केलं नाही. ते व्हिपचं उल्लंघन करून बैठकीला हजर राहिले नाही. त्याबद्दल कारवाई सुरू आहे. हा तांत्रिक मुद्दा आहे. काही खासदार संपर्कात आहे. मतदारसंघात जायला त्यांना भीती वाटते. लोकांचा रोष आहे. खासदार म्हणतात आम्ही शिवसेनेत आहोत. काही गैरसमज होत आहे. अशा खासदारांशी चर्चा करणं स्वाभाविक आहे. ज्या क्षणी सांगतील शिवसेना सोडतील. तेव्हा संबंध तोडू. आज उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईत येऊन मेळावे घेणार आहे. त्यानंतर २७ ते २९ तारखेला या सर्व खासदारांच्या मतदारसंघात जाणार आहे. नागपूर यवतमाळपासून दौरा सुरू होईल. तो शिर्डीला संपणार आहे. मराठवाड्यात जाणार आहे. ही एक प्रक्रिया आहे. त्यात धाराशिव, हिंगोली, परभणी आहे. या सर्व मतदारसंघात जाणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.