केतनचं स्थळ आणलं, फोटो दाखवताच सिया काय म्हणाली?, सियाच्या आई-वडिलांनी पोलीस चौकशीत सगळं सांगितलं, मुलीला तोंडावर पाडलं!
नाजिम मुल्ला, एबीपी माझा June 28, 2026 09:43 AM

प्रश्न : सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का?

उत्तर : सिया आणि चेतन मित्र आहेत, याबाबत आम्हाला काही कल्पना नाही. सियाने चेतनबद्दल आम्हाला कधीचं काही सांगितलं नाही. त्यामुळं सिया आणि चेतनचे प्रेमसंबंध होते की नव्हते? याची आम्हाला काहीच कल्पना नाही.

प्रश्न : सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का?

उत्तर : सियाने चेतन नावाच्या मुलाशी लग्न करायचं आहे, असं एकदा ही सांगितलं नाही. 

प्रश्न : सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का?

उत्तर : केतनचे स्थळ मित्तल यांनी आणलं. त्यावेळी आम्ही सियाला केतन अग्रवाल नावाच्या मुलाबाबत सांगितलं. त्याचे फोटो ही आम्ही तिला दाखवले. आधी तिची संमती घेतली आणि मगचं अग्रवाल कुटुंबीयांशी पुढची चर्चा झाली. लग्नाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सियाला केतन पसंत आहे का? याची आम्ही खात्री केली. तिचा होकार आल्यावरचं आम्ही लग्न करायचं ठरलं. तिची संमती होती, म्हणूनचं साखरपुडा ही घेण्यात आला.

प्रश्न : सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का?

उत्तर : लग्न ठरल्यापासून सिया आणि केतनचा संवाद सुरु होता. साखरपुडा झाल्यावर ते अनेकदा भेटले, फिरायला ही गेले. या दरम्यान केतन अनेकदा घरी पण आले, मात्र सियाने केतनचा स्वभाव पटत नाही. अशी तक्रार केली नाही.

प्रश्न : सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का?

उत्तर : सियाने मी केतनशी जबरदस्तीने लग्न करत आहे, असं एकदा ही म्हटलं नाही. ती आमची लाडकी लेक आहे, त्यामुळं आम्ही कोणतीही जबरदस्ती केलेली नाही.

प्रश्न : लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का?

उत्तर : याबाबत आम्हाला काहीचं कल्पना नव्हती

प्रश्न : साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का?

उत्तर : साहिलने स्वतः तो चेतनचा मित्र असल्याचं सांगितलं आहे. क्रिकेट खेळण्यासाठी ते एका मैदानावर भेटतात. साहिलचे तसे बरेच मित्र आहेत, त्यापैकी चेतन एक असू शकतो. मात्र साहिल आणि चेतनला आम्ही एकत्र कधी पाहिलं नाही. 

प्रश्न : केतनच्या हत्येचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?

उत्तर : सियाने असं काही केलं असेल, यावर आमचा आज ही विश्वास बसत नाही. केतन आमच्या घरी यायचे, सियासोबत फिरायला जायचे. आम्ही नेहमीचं या दोघांना हसत-खेळत असल्याचं पाहिलंय. त्यामुळं असा काही कट रचला जातोय किंवा रचला गेलाय, याबद्दल मनात शंका येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. 

नेमकं प्रकरण काय? (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

बालीचा बेत फसल्यानंतर, 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही. 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजीच लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

संबंधित बातमी:

Ketan Agrawal Pune Lohagad Case: सख्ख्या भावनेही आता सियाला तोंडावर पाडलं; पोलिसांना दिली केतन अग्रवाल प्रकरणाला नवं वळण देणारी माहिती, 10 तासांच्या चौकशीत काय काय म्हणाला?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.