अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी, अभिनेत्री आकांक्षा चमोला यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. हे दोघेही 10 वर्षांच्या संसार आता मोडत आहे आणि घटस्फोट घेत आहेत. सध्या सुरू असलेल्या ‘लॉकअप 2’ या रिॲलिटी शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आकांक्षाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल हे सांगून सगळ्यांच धक्का दिला.
‘लॉकअप 2’ या रिॲलिटी शोमध्ये बोलताना आकांक्षाने उघड केले की, ती आणि गौरव गेल्या वर्षभरापासून एकमेकांपासून वेगळे राहत असून आता त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
24 नोव्हेंबर 2016 रोजी गौरव आणि आकांक्षा लग्नबंधनात अडकलेले. लग्नाला जवळजवळ दहा वर्ष होऊनही या जोडप्याने मुलांना जन्म दिला नाही. काही काळापूर्वी ‘बिग बॉस 19’ मध्ये बोलताना गौरवने सांगितले होते की, सुरुवातीला त्याला बाबा होण्याची इच्छा होती, पण आकांक्षा तेव्हा मानसिकदृष्ट्या तयार नसल्यामुळे त्याने तिच्या इच्छेचा मान राखला.”
आता घटस्फोटाच्या या वृत्तादरम्यान, आकांक्षा चमोलाची काही महिन्यांपूर्वीची एक मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या या मुलाखतीत तिला विचारण्यात आले होते की, “जर एखादी महिला आपल्या पतीसोबतच्या शारीरिक संबंधांमध्ये असंतुष्ट असेल, तर त्या आधारावर तिला घटस्फोट मिळण्याचा अधिकार आहे का?” आता या प्रश्नावर तिने दिलेले उत्तर चर्चेचा भाग बनत आहे.
यावर आकांक्षाने अत्यंत बिंधास्त उत्तर दिले होते की, ” हो का नाही, जर एखादी महिला तिच्या वैवाहिक आयुष्यात शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या आनंदी नसेल, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या नात्यावर होऊ शकतो आणि हे देखील घटस्फोटाचे एक मुख्य कारण असू शकते. दुर्दैवाने आपण ज्या समाजात राहतो तिथे आजही महिलांच्या खाजगी आयुष्याशी आणि इच्छांशी जोडलेल्या गोष्टींना एक टॅबू मानले जाते, जे चुकीचे आहे.”आता यावरुन तर आकांक्षा आणि गौरव यांचा घटस्फोट होत नाहीये ना असा अंदाज लावला जात आहे.