ALSO READ: अमरावती जिल्ह्यात धारणीमध्ये बैलगाडीवर विजेचा खांब कोसळून शेतकरी दाम्पत्य आणि दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
हवामानातील अचानक बदलामुळे ऑरेंज अलर्टचे रेड अलर्टमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. आयएमडीनुसार, सततच्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, अचानक पूर येणे, नदीची पातळी वाढणे आणि भूस्खलनाचा धोका आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडू शकतात आणि जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचे नुकसान होऊ शकते.
ALSO READ: मुंबईत आज सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; शाळा आणि महाविद्यालये बंद, बीएमसीकडून सूचना जारी
कोकण किनारपट्टीवर उंच लाटा आणि खराब हवामानाची शक्यता असून, त्यामुळे रस्ते, रेल्वे, हवाई आणि फेरी सेवा विस्कळीत होऊ शकतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) लोकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि झाडे, मोडकळीस आलेल्या इमारती, विजेचे खांब व जाहिरात फलकांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना समुद्रकिनारे आणि पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी बीएमसी आणि इतर सरकारी संस्थांचे सुमारे १५,००० अधिकारी आणि कर्मचारी शहरभर तैनात करण्यात आले आहे.
ALSO READ: मुंबईत मुसळधार पावसात झाड कोसळून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik