'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
भाग्यश्री कांबळे July 09, 2026 05:13 PM

Raj Thackeray On RJ Malishka: मुंबईतील (Mumbai Rain) पावसामुळे दरवर्षी निर्माण होणारी परिस्थिती आणि त्यावरुन मुंबईकरांची होणारी दमछाक, यावर आर.जे मलिष्का हिनं 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?  हे गाणं 2017 साली तयार केलं होतं.  यानंतर 2018 साली तिंन रस्त्यांवरील (RJ Malishka) खड्ड्यांमुळे जनतेची होणारी दुरावस्था, यावर भाष्य करणारं गाणं तयार केलं होतं.  मुंबईत मुसळधार पाऊस पडला की, आजही या गाण्याची आठवण अनेकांना होते. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुंबईला पावसामुळे उद्भवणारी समस्या आणि मुंबई- पुणे मिसिंग लिंक प्रकरणावरुन,  सत्ताधाऱ्यांवर टीका करत असताना आरजे मलिष्काच्या गाण्याचा उल्लेख केला.

आर.जे मलिष्कावर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? (Raj Thackeray on RJ Malishka)

एकीकडे पाऊस पडल्यामुळे मुंबईतील काही भाग तुंबले आहेत. तर, दुसरीकडे काही दिवसांपूर्वी लोकार्पण झालेल्या मुंबई - पुणे मिसिंग लिंकचे, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.  6 जुलै रोजी दरड कोसळली. स्लॅब पडल्यानंतर माती तसेच पाण्याचा लोंढा थेट मिसिंग लिंकवर पडला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या प्रकरणी सत्तेतील मंत्री 'ही गोष्ट नैसर्गिक आहे, यात राजकारण करु नका', असं त्यांनी म्हटलं होतं. 

आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले की, '2005 ला मुंबई तुंबली होती. 1000mm पाऊस पडला होता. त्यावेळी मुंबईची भयंकर हालत झाली होती. आता 300-350 पाऊस पडला आहे.  मुंबई तशीच तुंबलेली. तेव्हा वारेमाप आरोप करायचे, वाटेल ते बोलायचे.  पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केला,  तेव्हा वाटतं राजकारण नव्हतं. आता मुंबई तुंबली, तर म्हणतात नैसर्गिक आहे', असं राज ठाकरे म्हणाले.  

आर.जे मलिष्काचा आपल्या भाषणात उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाही काय?  असं म्हणणारी आता कुठे गेली?' या प्रश्नावर उत्तर देताना उपस्थितांमधील एका महिलेनं, 'मलिष्काने आणखी एक नवीन व्हिडीओ तयार केला आहे', असं सांगितलं. दरम्यान, यावर राज ठाकरे यांनी, 'नवीन व्हिडीओ तयार केला आहे,  चांगलं आहे.  म्हणजे ती कुणाला वाहिलेली नाहीये', असं राज ठाकरे म्हणाले. 'जेव्हा ती  अशा प्रकारची गाणी गात होती, तेव्हा सुख घेतलं. आता  दुसरे जेव्हा बोलायला लागले तेव्हा त्रास व्हायला लागला', असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.