चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट..
GH News July 13, 2026 11:10 AM

भारत आणि चीन यांच्यात मोठा संघर्ष राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या तुलनेत संबंध चांगली आहेत. मात्र, चीन काही मागून काट्या करण्याचे थांबत नाही. चीनकडून ब्रह्यपुत्र नदीवर मोठे धरण बांधण्याचे प्लॅनिंग होते. अगदी भारताच्या सीमेच्या जवळ ते धरण बांधण्याची त्यांची योजना होती. शिवाय अरूणाचल प्रदेश आमचाच भाग असल्याचा दावाही त्यांच्याकडून केला जातो. हे क्षेत्र भारताच्या अरूणाचल प्रदेशाच्या सीमेच्या अत्यंत जवळ आहे. हांगकांच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार, वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्व हिमाचल क्षेत्रात मोठा जलविद्युत प्रकल्पाच्या मजबूतीबद्दल शंका आहे. कडक जमिन परिणाम करू शकते. चायना जियोलॉजिकल संस्थेकडून सर्वे केला जात आहे.

संशोधन करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आसपासच्या पर्वतरांगाची तोडफोड केली तर ते कमजोर होऊ शकतात. त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. चीनमध्ये ब्रह्यपुत्र नदीला यारलुंग त्यांगपो म्हटले जाते. चीनने गेल्या वर्षी जुलैमध्ये तिब्बतमध्ये बह्यपुत्र नदीवर 167.8 अरब अमेरिकी डॉलरचे धरण बांधण्याचे जाहीर केले. त्याचे कामही जुलै महिन्यात गेल्या वर्षी सुरू करण्यात आले.

ज्याच्या माध्यमातून दरवर्षी तब्बल 300 अरब किलोवाट वीज तयार होऊ शकते. 30 कोटी लोकांना ती वीज मिळू शकते. हे धरण हिमालयाच्या विशाल पर्वतांच्या जवळ तयार केले जातंय. ब्रह्यपुत्र नदी अरूणाचल प्रदेशमध्ये दाखल होण्यापूर्वी मोठा युटर्न घेते. त्यावेळी ती थेट बांगलादेशात जाते. अरूणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीन मुद्द्यात धरण बांधत आहे. अरूणाचल प्रदेशवर चीनचा कायमच दावा आहे. त्याच सीमेवर आपली ताकद त्यांच्याकडून वाढवली जातंय.

ज्या ज्यावेळी चीनने अरूणाचल प्रदेशबद्दल दावा केला, त्यावेळी भारताने अरूणाचल प्रदेश भारताचा महत्वाचा भाग असल्याचे नमूद केले. चीनकडून असे काही नकाशे प्रसिद्ध केली जातात, ज्यात थेट अरूणाचल प्रदेश हा त्यांचा भाग असल्याचे दाखवले जाते. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीनमधील संबंध चांगले झाले आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफचा जोरदार विरोध चीनने केला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.