Sangram Chougule : संग्राम चौघुलेने (Sangram Chougule) बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi New Season) वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. पण दोनच आठवड्यात संग्रामचा खेळ संपला असून वैद्यकीय कारणामुळे संग्रामला घराबाहेर पडावं लागलं आहे. दरम्यान आता संग्रामवर रुग्णालयात उपचार करण्यात येणार असून त्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचंही बिग बॉसने म्हटलं आहे.
संग्रामचा खेळ सुरुवातीपासून प्रत्येकाला वीक वाटत होता. त्यातच रितेश भाऊंनीही भाऊच्या धक्क्यावर त्याच्या खेळाविषयी त्याची कानउघडणी केली होती. त्यातच आता संग्रामला दुखापत झाल्याने त्याला घराचा निरोप घ्यावा लागला आहे. त्यामुळे घरात आलेल्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने दोनच आठवड्यात खेळ आटोपता घेतला.