महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
abp majha web team October 01, 2024 02:43 PM

Monsoon: महाराष्ट्रात यंदा मान्सूनची दमदार हजेरी लागली असून जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा 126% पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद मध्य महाराष्ट्रात झाल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षी सरासरीहून कमी पाऊस झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळावे लागले. पण यंदा पावसाने मागील वर्षीची कसर भरून काढली आहे. 

राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान 994.5 मी पावसाची नोंद होत असते मात्र, यंदा प्रत्यक्षात 1,252.1 मीमी पाऊस बरसला आहे. 

मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस 

राज्यात यंदा मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने तर पूर परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 139% अधिक पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाळ्यात साधारण 747.4 मी पाऊस कोसळतो. यंदा मात्र यात अधिकची भर पडली आहे. मध्य महाराष्ट्रात यंदा 1335.8 मीमी पाऊस पडला आहे. 

कोकणात सरासरीपेक्षा 129% पाऊस 

कोकणात मान्सून मध्ये एरवी 2870.8 mm एवढ्या सरासरी पावसाची नोंद होत असते. मात्र, यंदा 3710.6 m पाऊस झाला आहे. कोकणात यंदा सरासरीपेक्षा 129% पाऊस झाला आहे. कोकणासह मुंबई उपनगरातही बेफाम पाऊस झाल्यानं धरणे भरली आहेत.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मान्सूनने दिलासा

दुष्काळी मराठवाड्यावर यंदा मान्सून ने आभाळमाया दाखवली असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात सरासरी 642.8 mm पाऊस होत असतो. यंदा ७७२.५ मी पावसाची नोंद करण्यात आली असून सरासरी पेक्षा 120% पाऊस अधिक झाला आहे. मराठवाड्यातील धरणे तुडुंब भरली असून रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

विदर्भात किती झाला पाऊस? 

दर मान्सून मध्ये विदर्भात सरासरी 937.3 मी पाऊस होत असतो. यंदा प्रत्यक्षात 1098.5 m पाऊस झाला आहे. विदर्भात 117% अधिक पावसाची नोंद झाली असून नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. 

परतीच्या पावसाचा मुक्काम कधीपर्यंत? 

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सध्या नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब तसेच जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश या भागातून सध्या मान्सून एक्झिट घेत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात या भागातून मान्सून माघारी फिरेल. दरम्यान पाच ऑक्टोबरनंतर  उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा वाढवून त्यानंतर मान्सून माघारी फिरेल असा अंदाज देण्यात आला आहे.

Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.