वाशिम : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता वाशीम जिल्ह्यातून (Washim Crime News) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिंगणापूर (Shingnapur) येथे शुल्लक कारणावर एका 30 वर्षीय युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून (Police) शोध घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंगणापूर येथे शुल्लक कारणावरून एका 30 वर्षीय युवकाला काही लोकांनी बेदम मारहाण केली. या घटनेत युवकाचा मृत्यू झाला असून शिवमंगल भोसले असं मृत व्यक्तीचे नाव आहे. शेतीच्या कामावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या घटनेत एकूण 13 आरोपी असल्याचं कळते. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी 13 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना जेरबंद केले आहे. मृतकाच्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपी ताब्यात घेत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस पुढील तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी वाशिमच्या रिसोड शहरालगत असलेल्या वस्तीतील एका 14 वर्षीय बालिकेवर अपहरण करून तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. पिडीत बालिकेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून रिसोड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन नराधम आरोपीना अटक केली आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
खिडकीतून लपून मुलींना आंघोळ करताना बघायचा; घराबाहेर कॅमेरा लावला अन् तावडीत सापडला, भाईंदरमधील घटना