नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
एबीपी माझा वेब टीम October 04, 2024 11:13 AM

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील मोवाडमध्ये कुटुंबाने सामूहिकरित्या जीवन संपवल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपुर्वी समोर आली होती. नागपूर जिल्ह्यातील मोवाडमध्ये एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामध्ये निवृत्त शिक्षक विजय पचोरी यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह त्यांनी आत्महत्या केली होती. आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे.

कुटुंबातील चौघाने गळफास घेउन आत्महत्या केली. मात्र, दोघांच्या शरीरात विषाचे अंश आढळल्याची माहिती समोर येत आहे. मृत गणेशची आई माला आणि भाऊ दिपकच्या शरीरात विष आढळून आल्याची माहिती आहे. मात्र या संदर्भात न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावर चौघाची हत्या झाली होती की आत्महत्या हे स्पष्ट होणार आहे. हे प्रकरण आत्महत्या वाटत असले तरीही अनेक अनुत्तरीत प्रश्नांवरून ही हत्या करून आत्महत्या असल्याचे भासवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड गावामध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घटनासमोर आली होती. यामध्ये पती- पत्नी आणि दोन्ही मुलांचा समावेश आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. विजय मधुकर पाचोरी (६८), माला विजय पचोरी (५५), गणेश विजय पचोरी (३८) आणि दीपक विजय पचोरी (३६) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विजय पाचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, त्यांची पत्नी माला आणि दोन्ही मुले गणेश आणि दीपक यांच्यासोबत ते राहत होते. विजय पाचोरींनी एक सोसायटी उघडली होती. अनेकांनी त्यामध्ये पैसे गुंतवले होते. पंरतु, ती सोसायटी बुडाली. त्यानंतर लोकांनी पैशासाठी विजय पाचोरी यांच्या मागे तगादा लावला. या संदर्भात काही गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रारी केल्या. यासंदर्भात पोलिसांनी विजय यांचा मुलगा गणेश पाचोरीला अटक देखील केली होती. तो नुकताच कारागृहातून सुटून आला होता.

विजय पाचोरींच्या घरी लोक पैसे मागायला येत होते आणि सतत पैसे मागण्याचा तगादा आणि कुटुंबाची होणारी बदनामी बघता कुटुंबियांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.

तिघांचा खून करुन विजय पाचोरी यांची आत्महत्या?

लोक पैशासाठी तगादा लावत असल्याने विजय यांनी पत्नी, मुलगा गणेश व दीपक यांचा खून केल्यानंतर स्वत: गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. पत्नी माला, दीपक आणि गणेश या तिघांचे हात दोरीने बांधलेले होते. तर विजय पाचोरी यांचे हात मोकळे होते. त्यावरून तिघांचा खून करुन विजय यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नरखेड पोलीस त्या अनुषंगाने सुद्धा तपास करीत आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.