बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस विजयी झाल्यानंतर सूरज त्याच्या पर्सनल लाईफमुळे लक्ष वेधून घेत आहे. बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांची मने जिंकणारा सूरजला प्रेमात धोका मिळाला आहे. नुकतंच एका मुलाखतीत सूरजने याबद्दलचा खुलासा केला आहे.
सूरजने त्याच्या एका मुलाखतीत, प्रेमामध्ये किती मुलींनी धोका दिला याबद्दल सांगितलं आहे. सूरज म्हणाला, "एकच होतं माझ्या जिवाचं रानपाखरू परंतु गुलिकत उडून गेलं" सूरजने त्याची गर्लफ्रेड सोडून गेल्याचं सांगितलं आहे. एकत्र असल्यानंतर अचानक सोडून गेल्यानंतर सूरज आयुष्यात नवा निश्चय केला आहे.
बिग बॉसच्या घरात सूरजने त्याच्या प्रेमाबद्दल सांगितले होते. सूरजचं एका मुलीवर प्रेम होतं दोघेही एकमेकासोबत बोलायचे,फिरायचे. पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला, लगेच मला सोडून गेली.गोलीगत धोका मिळाल्यानंतर सूरज रागवला. मात्र त्याने मनाशी निश्चय केली की आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं त्याने रिल्स तयार करुन, गाणी तयार करुन प्रसिद्धीचे शिखर गाठले. .