पुणे : राज्यात आचारसंहिता लागू झालेली असताना खेड-शिवापूर येथे एका गाडीत तब्बल 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रोकड पकडली गेल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले जात आहेत. आमचे कार्यकर्ते गेले म्हणून फक्त 5 कोटी तरी पकडले गेले. त्यावेळी घटनास्थळी आणखी 10 कोटी रुपये होते, असा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवेसनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. विरोधक पकडण्यात आलेल्या गाडीचा संबंध शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्याशी जोडत आहेत. असे असतानाच आता या प्रकरणात आता खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे.