चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतीय संघाने २३ फेब्रिवारी रोजी पाकिस्तानला पराभूत करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
या विजयात विराट कोहलीने शतक करत मोलाचा वाटा उचलला.
विराटने १११ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
विराटने पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक ५ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. तसेच वनडेतील ४२ वा सामनावीर पुरस्कार आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिकवेळा वनडेत सामनावीर जिंकणारा तो भारतीय खेळाडू आहे.
विराटने या खेळीदरम्यान १४ हजार धावा देखील पूर्ण केल्या.
विराट सचिन तेंडुलकर (१८४२६ धावा) आणि कुमार संगकारा (१४२३४ धावा)यांच्यानंतर १४ हजार धावा करणारा तिसराच फलंदाज आहे.
विराटचे हे वनडेतील ५१ वे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८१ वे शतक ठरले आहे.
विराट वनडेत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा सचिननंतरचा (१०० शतके) दुसरा फलंदाज आहे.
याशिवाय विराट आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाराही तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याचे आता २७५०३ धावा झाल्या असून त्याने पाँटिंगच्या २७४८३ धावांना मागे टाकले आहे.
विराटच्या पुढे आता फक्त सचिन तेंडुलकर (३४३५७ धावा) आणि कुमार संगकारा (२८०१६ धावा) आहेत.