'इंद्रायणी' (Indrayani ) आणि 'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala ) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. या मालिकांमध्ये महाशिवरात्रीचे विशेष भाग दाखवले जाणार आहेत. 'इंद्रायणी' मालिकेत महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कथानकात नवे वळण येणार आहे. इंद्रायणीचे काका-काकू खरे नसून ते फसवे असल्याचे समजताच ते इंदूला धमकी देतात की, जर तिने हे सत्य कोणालाही सांगितले तर अधूच्या जीवाला धोका होईल. यामुळे इंद्रायणी संभ्रमात पडते आणि या परिस्थितीत इंद्रायणी गुप्तपणे गोपाळला सत्य कळवण्याची योजना आखते.
(Mahashivratri ) दिवस उगवतो. इंदूला काका-काकूंकडून महाशिवरात्रीच्या कीर्तनाची परवानगी मिळते. कीर्तनाच्या वेळी ती 'पुत्रणा मावशीचे कीर्तन' सादर करत असताना गोपाळला काका-काकू खरे नसल्याचे संकेत देते. आता यामुळे खोड्या काका - काकूंचा पर्दाफाश कशी करणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
'लय तू मला' मालिकेत सरकार - सानिकाचा कळशी गावातील गावकऱ्यांसोबतच लढा सुरूच आहे. साहेबरावांनी साखर कारखाना बंद केल्यानंतर कळशीगाव बेरोजगारीसाठी सानिका आणि सरकारला जबाबदार धरते. मात्र, या विरोधातही सानिका हार मानत नाही. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ती एक नवा मार्ग शोधते आणि तो म्हणजे 'चहाचा गूळ’ तयार करण्याचा. मात्र गावकरी तिच्या कल्पनेला अशक्य मानून तिची खिल्ली उडवतात.
सानिका आव्हान स्वीकारून स्वतः गूळ बनवून दाखवण्याचा निर्धार करते. दरम्यान, सरकारदेखील महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कठोर व्रत करताना दिसणार आहे. सानिकाच्या अथक प्रयत्नांना यश मिळावे, म्हणून सरकार प्राचीन महादेव मंदिरातील शिवलिंगावर 101 वेळा नदीचे पाणी वाहण्याचा संकल्प करतो. एकीकडे सानिका गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि बेरोजगारी मिटवण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरीकडे सरकार तिला यश मिळावे यासाठी झुंजतो आहे.
महादेवाच्या आशीर्वादाने सानिका - सरकार कसे हे आव्हानं पार करणार. हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'इंद्रायणी' आणि 'लय आवडतेस तू मला' मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग २६ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजता आणि रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहेत.