देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. फक्त चूल आणि मुलं या विचार धारेत अडकलेल्या महिला देशाच्या विकासात भागीदार झाल्या
यात देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी पासून पहिल्या महिला वैमानिकपर्यंत अनेक महिला आहेत
बदलत्या काळात आज घराबाहेर पडून महिला वैमानिक यशस्वी उड्डाण करत आहेत. प्रेम माथूर हे 1947 मध्ये देशांतर्गत विमान उड्डाण करणारे पहिले भारतीय व्यावसायिक वैमानिक होते. दुर्बा बॅनर्जी 1956 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या पहिल्या महिला पायलट बनल्या
पण त्यांच्याही आधी उषा सुंदरम यांनी स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या वैमानिक ठरल्या होत्या. तर त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षीच विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं होतं
त्यांनी केलेलं सगळ्यात पहिले उड्डाण पिस्टन इंजिनसह इंग्लंडहून भारतात केले. ज्याची विश्व विक्रमात नोंद करण्यात आली होती. 1936 मध्ये लाहोर फ्लाइंग क्लबसाठी त्यांनी उड्डाण केले होते.
उषा यांनी त्यांच्या पतीसह लंडन ते चेन्नई 23 तासांचे विमान उडवून विक्रम केला होता. या विक्रमांची इतिहासात नोंद झाली होती.
भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान पाकिस्तानमध्ये अडकून पडलेल्या लोकांना वाचवण्याचे काम उषा सुंदरम यांनी केले होते.