KKR vs RCB: आयपीएल २०२५ चा पहिलाच सामना रद्द झाला तर काय होणार? पॉइंट कोणत्या संघाला? जाणून घ्या 'हे' समीकरण...
esakal March 21, 2025 09:45 PM

आयपीएल २०२५ चा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. तर त्याचा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाईल. यावेळी स्पर्धेचा १८ वा हंगाम आहे. ज्याचा पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. दोघांमध्ये कडक स्पर्धा अपेक्षित आहे. पण सामन्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तो रद्दही होऊ शकतो.

या सामन्यापूर्वी चाहत्यांना हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की सामना बरोबरीत सुटला किंवा रद्द झाला तर काय होईल? आयपीएल २०२५ मध्ये १० संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघाला जिंकल्याबद्दल २ गुण दिले जातील. परंतु जर कोणत्याही कारणास्तव सामना रद्द करावा लागला आणि निकाल लागला नाही, तर दोन्ही संघांमध्ये १-१ गुण वाटले जातील.

तथापि, जर सामना बरोबरीत राहिला तर सुपर ओव्हरद्वारे निकाल लावला जाईल आणि विजेत्या संघाला २ गुण मिळतील. अशाप्रकारे, लीग टप्प्यात खेळल्या गेलेल्या १४ सामन्यांनंतर, टॉप-४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. त्याच वेळी, जर दोन किंवा अधिक पॉइंट टेबलमध्ये समान गुण असतील, तर टॉप-४ आणि प्लेऑफ नेट रन रेटच्या आधारे ठरवले जातील.

या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ३४ सामने खेळले गेले आहेत. या काळात कोलकाता नाईट रायडर्सने २० सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने १४ सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे केकेआरचा वरचष्मा दिसतो. तर आता केकेआर आणि आरसीबीचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते असा प्रश्न उपस्थित होतो.

केकेआर आणि आरसीबीचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

कोलकाता नाईट रायडर्स: सुनील नारायण, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा/वरुण चक्रवर्ती

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिलिप साल्ट, विराट कोहली , देवदत्त पडिकल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा/रसिक दार सलाम.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.