मुंबई महाराष्ट्राच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी हुत्मात्यांना आणि महापुरुषांना अभिवादन केले ते म्हणाले की, "मी छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील इतर महान समाजसुधारकांना अभिवादन करतो जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो. महाराष्ट्र सरकारने तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी योग्य ती कारवाई केली असंही ते म्हणाले.
Pakistani Army : पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा केला गोळीबार, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तरनवी दिल्ली : ३० एप्रिलच्या रात्री आणि १ मे'च्या पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने पुन्हा गोळीबार सुरू केला. हा गोळीबार कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये झाला, जे अनेकदा तणावाचे केंद्र बनले आहे. या कारवाईला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
इंडियन ऑइलने एलपीजी गॅसचे नवे दर जारी केले आहेत. आज १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले आहे. व्यावसायिक सिलिंडरचा दर १७ रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर आता १८६८.५० रुपयांऐवजी १८५१.५० रुपये झाला आहे. मुंबईत या सिलिंडरची किंमत आता १७१३.५० रुपयांऐवजी १६९९ रुपये आहे आणि चेन्नईमध्ये १९२१.५० रुपयांऐवजी १९०६.५० रुपये आहे. तर, घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये ८५३ रुपयांना, कोलकातामध्ये ८७९ रुपयांना, मुंबईत ८५२.५० रुपयांना आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपयांना उपलब्ध आहे.
Radhakrishna Vikhe Patil : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर गुन्हा दाखल, शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोपशिर्डी : प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने सभासद शेतकऱ्यांना बेसल डोसचे वाटप करण्याच्या नावाखाली बॅंकेतून ८ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज काढले. परंतु ही रक्कम सभासदांना न देता उलट कर्जमाफी योजनेत हे कर्ज माफ करून घेत फसवणूक केली. याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कारखान्याचे तत्कालीन संचालक मंडळ, साखर आयुक्त व सबंधित बॅंक अधिकारी अशा ५४ जणांविरुध्द सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी बाळासाहेब केरूनाथ विखे (वय ६६) यांनी फिर्याद दिली आहे.
Amul Milk Price Hike : मदर डेअरीनंतर 'अमूल'नेही दुधाचे दर वाढवले; आजपासून दूध दोन रुपयांनी महागणारनवी दिल्ली : 'अमूल'ने सामान्य माणसाला मोठा धक्का दिला आहे. आता दूध पिणे महाग होणार आहे. कंपनीने दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. कंपनीने किमतींमध्ये केलेला हा बदल आजपासून म्हणजेच १ मे पासून लागू होणार आहे. कंपनीने अर्धा किलो दुधाच्या म्हणजेच ५०० मिली दुधाच्या किमतीतही वाढ केली आहे. अमूलच्या लहान पॅकची म्हणजेच, अर्धा लिटर दुधाच्या पाऊचची किंमतही प्रति लिटर १ रुपयांनी वाढणार आहे.
MHT-CET Exam : सत्तावीस हजार विद्यार्थी पुन्हा सीईटी देणार; सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहितीमुंबई : राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राज्यात २७ एप्रिल रोजी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यातील इंग्रजी भाषेतील गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील २१ प्रश्नांमध्ये चुकीचे पर्याय आढळल्याने सीईटी सेलने संबंधित विद्यार्थ्यांची पुढील आठवड्यात नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी मुंबईत दिली. यापरीक्षेला ३१ हजार २० विद्यार्थी बसले होते. त्यातील २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेतील गणिताच्या प्रश्नपत्रिकेत एकूण २१ प्रश्नांमध्ये चुकीचे पर्याय होते.
Union Cabinet : यावर्षीच्या साखर हंगामात उसाच्या 'एफआरपी'त प्रतिटन १५० रुपयांची वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णयकोल्हापूर : यावर्षीच्या साखर हंगामात उसाच्या एफआरपीत प्रतिटन १५० रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे यावर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन ३५५० रुपये दर मिळेल. गेल्या वर्षीच्या हंगामात हा दर ३४०० रुपये प्रतिटन होता.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्कोला जाणार नाहीतमॉस्को : रशियामध्ये नऊ मे रोजी होणाऱ्या विजय दिनाच्या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नसल्याचे रशियाने स्पष्ट केले. त्यांच्याऐवजी संरक्षणमंत्री राजनाथसिंह उपस्थित राहू शकतात.
Maharashtra Day : राज्यात महाराष्ट्र दिन, तर संपूर्ण देशभरात साजरा होणार कामगार दिनLatest Marathi Live Updates 1 May 2025 : आज राज्यात महाराष्ट्र दिन, तर संपूर्ण देशभरात कामगार दिन साजरा होत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या संभाव्य कारवाईचे कयास लढविले जात असताना केंद्र सरकारने आज धक्क्कातंत्राचा अवलंब करताना जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. जातनिहाय जनगणनेच्या केंद्र सरकारच्या घोषणेचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वागत केले आहे. तसेच यावर्षीच्या साखर हंगामात उसाच्या एफआरपीत प्रतिटन १५० रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. रशियामध्ये नऊ मे रोजी होणाऱ्या विजय दिनाच्या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नसल्याचे रशियाने स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..