बाबासाहेब केवळ संविधानकार नाही, तर आर्थिक धोरणांचा पाया घालणारे दूरदृष्टीचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती दिली.
बाबासाहेबांच्या ‘The Problem of the Rupee’ या पुस्तकावरूनच रिझर्व्ह बँकेची भूमिका ठरली. आज RBI देशाच्या आर्थिक धोरणांचा कणा आहे.
बाबासाहेबांनी सांगितले की महाराष्ट्रासारख्या भागात शेतीला पाणी हवे – त्यामुळे धरणांची संकल्पना पुढे आली आणि शेती सक्षम झाली.
बाबासाहेबांनी कामगार कायदे केले. सुरक्षित कामगार = स्थिर उत्पादन = मजबूत अर्थव्यवस्था.
शिक्षण, उद्योग आणि नागरी सुविधांसाठी बाबासाहेबांनी केलेले प्रयत्न नागपूर, मुंबई यांसारख्या शहरांना उद्योगनगरी बनवले.
अशिक्षित समाज संपत्ती निर्माण करू शकत नाही. बाबासाहेबांनी महाराष्ट्रात हजारो विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी दिल्या.
शाश्वत विकास, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीने ते अर्थविकासाला गती देत होते.
आज महाराष्ट्र देशात सर्वात श्रीमंत राज्य आहे. या आर्थिक सामर्थ्याच्या मुळाशी बाबासाहेब आंबेडकर यांचेच योगदान आहे.