Maharashtra News Live Updates : पुण्यात हडपसरमधून उद्या पुणे- जोधपूर दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडीचा उद्घाटन
Saam TV May 03, 2025 05:45 AM
Nanded: नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची पिळवणूक, टोकन देऊनही खरेदी केली जात नाही हळद

नांदेड मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मात्र याच बाजार समितीत शेतकऱ्याची पिळवणूक होत असल्याचे पुढे आले आहे.

हळद विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले मात्र प्रत्यक्ष टोकन देऊनही शेतकऱ्यांची हळद खरेदी केली गेली नाही.

तर काही व्यापारी दुकानातच सकाळी भाव पाडून शेतकऱ्यांकडून माल खरेदी करत असल्याचे पुढे आले आहे.

या विरोधात शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

बाजार समितीच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास बाजार समितीला टाळे ठोकू असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Kalyan: ठेकेदाराचा निष्काळजीपणा, दुचाकीस्वार थेट खड्ड्यात पडला; ठेकेदारांवर कारवाई करा

कल्याण पश्चिम रोहिदास वाडा परिसरात रस्त्यालगत चेंबरचे काम सुरू आहे .

या कामासाठी ठेकेदाराने 15 दिवसांपूर्वी खड्डे खोदून ठेवलेत मात्र अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे त्याचप्रमाणे या कामाच्या आजूबाजूला कुठेही बॅरिगेटिंग केलेले नाही .

आज सकाळच्या सुमारास एक दुचाकीस्वार यारस्त्यावरून घसरला आणि तो थेट दुचाकीसह या खड्ड्यात पडला ..

सुदैवाने त्याला किरकोळ दुखापत झाली मात्र या घटनेमुळे ठेकेदाराचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला असून केडीएमसीने अशा बेजबाबदार ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनेक ठिकाणी रस्ते व चेंबरची काम सुरू असून या कामांसाठी अनेक ठिकाणी खोदकामे करण्यात आलेली आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून संबंध ठेकेदाराला खोदकामे करण्यात आलेल्या ठिकाणी कामे सुरू असलेल्या ठिकाणी सूरक्षिततेची काळजी घ्यावी अशी ताकीद देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही ठेकेदाराचा बेजबाबदारपणा सुरूच असल्याचे आज दिसून आले.

Jalgaon: जळगावात शिवतीर्थ मैदानासमोर असलेल्या समर एजन्सीला मध्यरात्री भीषण आग

आगीत दुकानातील विक्रीसाठी असलेले संपूर्ण नवीन कुलर, फ्रिज यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक होऊन जवळपास 40 ते 50 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती असून काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत दुकानाच्या सर्व मजल्यावर आग पोहोचली

घटनेची माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळ गाठले .आठ ते दहा अग्निशमन बंबांच्या माध्यमातून भीषण आग तब्बल चार ते पाच तासानंतर पहाटे साडेसहा वाजता आटोक्यात आली

आग आटोक्यात येईपर्यंत....भीषण आगीमध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते.

Karjat: मातीवर थेट डांबर कार्पेट टाकून रस्ता बनवला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण होत असल्याचे उघडकीस आले आहे.

मोरेवाडी मार्गे खांडस राज्यमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर हे डांबरी करणाचे काम सुरु असून पाथरज येथील ग्रामस्थांनी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे व्हिडीओ काढत अक्षेप नोंदवला आहे.

मातीने भरलेल्या रस्त्यावर कोणतीही पूर्व प्रक्रिया न करता थेट कार्पेट डांबरीकरण केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

रस्त्यावरील माती बाजूला न करता डांबरीकरण केले जात असेल तर त्या कामाचा चौकशी केली जाईल, जर काम खराब असेल तर ठेकेदाराकडून दुरुस्त करण्यात येईल अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे यांनी या प्रकरणी दिली आहे.

Nandurbar Temperature: नंदुरबार जिल्ह्यातील तापमानाचा कहर, उन्हाचा तीव्रतेमुळे तलावातील मासे आढळले मृत झाल्याचा अंदाज

नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपुर गावातील प्रकार....

उष्णतेमुळे तलावातील शेकडो मासे मृत....

तलावाच्या काठावर शेकडो माशांचा पडला खच.....

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस वर.....

तलावात मृत्युमुखी पडलेल्या माशांमुळे समशेरपुर गावात पसरली दुर्गंधी .....

पसरलेल्या दुर्गंधीमुळे गावकरींचे आरोग्य धोक्यात....

Pune - Nashik Highway :पुणे नाशिक महामार्ग पुन्हा ठप्प

संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात वाहतूक कोंडी...

घारगाव येथे सकाळपासून वाहतूक कोंडी...

वाहतूक कोंडीत दोन ॲम्ब्युलन्सही अडकल्या अडकल्या..

सकाळी आठ वाजेपासून वाहतूक कोंडी...

महामार्ग विस्तारीकरण कामाचा नागरीकांना फटका...

प्रशासनाचे ठिसाळ नियोजन...

कालही भर दुपारी चार तास झाली होती वाहतूक कोंडी...

आज सकाळपासून पुन्हा प्रचंड कोंडीने वाहन नागरिक हैराण...

मुजफ्फरपूर - पुणे - मुजफ्फरपूर विशेष गाडीच्या टर्मिनसमध्ये बदल

हडपसर स्थानकावरून सुटेल/टर्मिनेट होईल

पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म उपलब्धतेच्या अडचणीमुळे, गाडी क्रमांक 05289/05290 मुजफ्फरपूर – पुणे – मुजफ्फरपूर विशेष गाडीचे प्रारंभ/समाप्त स्थानक तात्पुरते पुणे ऐवजी हडपसर असे करण्यात आले आहे.

हा बदल पुढील सूचनेपर्यंत लागू असेल.

बदलाचा तपशील पुढीलप्रमाणे:

गाडी क्रमांक 05289 मुजफ्फरपूर – हडपसर विशेष आता ही गाडी पुणे ऐवजी हडपसर येथे टर्मिनेट होईल.

हडपसर आगमन वेळ: सकाळी 06:25 वा. प्रभावी तारीख: 05 मे 2025 (सोमवार)

गाडी क्रमांक 05290 हडपसर – मुजफ्फरपूर विशेष

आता ही गाडी पुणेऐवजी हडपसर येथून सुटेल.हडपसर प्रस्थान वेळ: सकाळी 10:00 वा.

प्रभावी तारीख: 07 मे 2025 (बुधवार)

यात्रेची योजना करताना प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी.

Pune: पुण्यात हडपसरमधून उद्या पुणे- जोधपूर दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडीचा उद्घाटन

पुणे विभाग, मध्य रेल्वे यांच्यातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी व जोडणी वाढवण्यासाठी हडपसर (पुणे) – जोधपूर दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरु करण्यात येत आहे.

गाडी क्रमांक 01401 हडपसर (पुणे) – जोधपूर उद्घाटन उद्या धावेल.ही गाडी हडपसर (पुणे) येथून 17:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 14:00 वाजता जोधपूर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01402 जोधपूर – हडपसर (पुणे) एकमार्ग TOD विशेष रविवारी धावेल.ही गाडी जोधपूर येथून 20:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 17:00 वाजता पुणे येथे पोहोचेल.

या ठिकाणी थांबणार ही गाडी - चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा, अहमदाबाद, मेहसाणा, पालनपूर, आबू रोड, पिंडवाडा, जवाई बांध, फालना, राणी, मारवाड, पाली मारवाड, लूणी.

कोच रचना 1 एसी 2-टियर, 4 एसी 3-टियर इकॉनॉमी, 5 स्लीपर क्लास, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 जनरेटर कार, 1 सामान व गार्ड यासाठी ब्रेक व्हॅन.

आरक्षण: गाडी क्रमांक 01401 साठी आरक्षण 02.05.2025 रोजी संध्याकाळी 16:00 वाजता सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व IRCTC वेबसाइटवर सुरु होईल.

अनारक्षित कोचचे तिकीट UTS App वरून सामान्य दरात बुक करता येतील जे सुपरफास्ट मेल/एक्सप्रेससाठी लागू आहेत.

Mahabaleshwar: 'मिनी काश्मीर' म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटन क्षेत्राला बळ देणारा 'महापर्यटन उत्सव'

2 मे पासून ते 4 मे पर्यंत असा तीन दिवस होत आहे. या भव्य महोत्सवानिमित्ताने महाबळेश्वरातील विविध पाँइंटवर विविध कार्यक्रम ठेवले आहेत. या उत्सवाच्या पूर्वसंधेला वेण्णालेक परिसरात केलेल्या लेझर शोमुळे उपस्थित सर्व पर्यटकांचे लक्ष वेधत आहेत.

Badlapur: बदलापूरमध्ये रेल्वेच्या ठेकेदारांकडून शेतजमिनीची नासधूस

बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान दरम्यान खरवई इथे रुळाखालून पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठे पाईप टाकण्याचं काम सुरू केलंय.

हे काम करत असताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ठेकेदाराने शेताचे बांध, बंदिस्ती तोडून शेतजमिनीचं नुकसान केलंय.

त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी शेती लावताना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

याबाबत खरवई येथील स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र जमून याविरोधात अंबरनाथच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.

विकासकामांना आमचा विरोध नाही, मात्र आमच्या शेतीचं झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी अंबरनाथच्या तहसीलदारांकडे केली आहे.

Pankaja Munde: मंत्री पंकजा मुंडे उद्या किट्टी आडगावला जाणार, स्व.बाबासाहेब आगेंच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार

- ११:३० वाजता माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव मध्ये जाऊन सांत्वनपर भेट घेणार आहेत.

- भाजपचे बीड विस्तारक बाबासाहेब आगे यांची काही दिवसांपूर्वी झाली होती हत्या.

- माजलगाव शहरातील भाजप कार्यालयासमोरच नारायण फपाळ याने कोयत्याने वार करत केली होती निर्घृण हत्या.

- मंत्री पंकजा मुंडेंनी कुटुंबियांना फोनवरून धीर दिला होता. आपण भेटायला येणार असंही आश्वासन दिलं होतं

Beed Crime: परळी तालुक्यात पुतण्याकडून वयोवृद्ध चुलतीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून

परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथील घटना परिमाळा बाबुराव कावळे वय 65 वर्ष असे मयताचे नाव आहे

आरोपी दारूडा पुतण्या चंद्रकांत धुराजी कावळे वय 25 वर्ष कावळ्याचीवाडीतील धक्कादायक घटना

आरोपी चंद्रकांत कावळे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी परिमाळ कावळे यांच्याकडे करायचा त्याही त्याला पैसे देत होत्या परंतु आरोपी हा सतत पैशाची मागणी करून त्रास देत होता

काल 6 वाजताची घटना असून आरोपीने परिमाळा यांच्याकडे पैशाची मागणी केली होती मात्र माझ्याकडे पैसे नाही येत त्याचाच राग आल्याने आरोपीने आपल्या सोबत आणलेल्या कुराडीने अंगावर व डोक्यावर सपासप वार करून तो तिथून फरार झाला आहे त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे

याप्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती

मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालय प्रेत पाठविण्यात आले आहे.

Badlapur Railway: बदलापूर स्टेशनवरील तिकीट खिडकी उन्हात, तळपत्या उन्हात उभं राहून काढावी लागतात तिकिटं

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मवरील तिकीट खिडकी उन्हात असल्यानं प्रवाशांना तळपत्या उन्हात उभं राहून तिकिटं काढावी लागतायत.

बदलापूर पश्चिमेकडील प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी उन्हात उभं राहावं लागतंय.

बदलापूर शहरातील तापमानाचा पार चाळीशी पार गेला आहे. त्यात ही तिकीट खिडकी उन्हात असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागतोय.

काही दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकावरील पश्चिमेकडील तिकीट खिडकी तोडण्यात आली असून ती तात्पुरत्या स्वरूपात होम प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आली आहे.

मात्र सध्या उन्हाचा पारा बघता इथे किमान शेडची व्यवस्था तरी करावी, अन्यथा ही तिकीट खिडकी सावलीत ठेवण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Maharashtra Politics: दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या फक्त अफवाचं, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने सगळ्या चर्चेतील हवाच काढली

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याची सुतराम शक्यता नसल्याचं म्हटलं आहे

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबतच्या जाणीवपूर्वक बातम्या बरेच दिवसापासून पेरल्या जात आहेत.

वास्तविक असे काहीही होण्याची सुतराम शक्यता नाही. केवळ अफवा आहेत

दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार तेव्हाच होऊ शकतो जेव्हा अजित पवार आणि मित्र मंडळी प्रतिगामी विचाराच्या भाजपची साथ सोडून महायुतीतून बाहेर पडतील.

Solapur: 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा उपक्रमात सोलापूरचे एस.पी अतुल कुलकर्णी ठरले सर्वोत्तम पोलीस अधीक्षक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली सोशल हँडलवर घोषणा

- राज्यातील पाच पोलीस अधीक्षकांमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे कार्यालय अग्रेसर ठरले आहे.

- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे काम राज्यात पाचव्या क्रमांकावर लक्षवेधी ठरले आहे.

- कमी कालावधीत जिल्हाभरातील पोलीस स्टेशनमध्ये अमूलाग्र बदल घडवला आहे

Washim: वाशिम जिल्ह्यातील शासकीय 102 रुग्णवाहिका चालकांचं वेतन थकल्यानं उपासमारीची वेळ

वाशिम जिल्ह्यातील शासकीय 52 रूग्ण वाहिकांवरील कंत्राटी चालकांचे मागील 5 महिन्यांपासून वेतन थकीत असल्यानं या चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

या 102 रुग्ण वाहिकेद्वारा गर्भवती महिला तसेच प्रसूती झालेल्या महिला आणि त्यांच्या बाळांची घरापासून रुग्णालयापर्यंत ने - आण केल्या जाते.

तसेच अत्यावश्यक वेळी इतर जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयात ही ने - आण करावी लागते.

एवढी अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील 102 या शासकीय रुग्णवाहिका चालकांना मागील 5 महिन्यांपासून वेतन नसल्यानं त्यांची आर्थिक स्थिती ढासळली असून कुटुंबाचा उदरनिर्वाह ही चालवणं कठीण झालं आहे.

त्यामुळं या रुग्णवाहिका चालकांनी आरोग्य प्रशासनाला थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे. जर 4 मे 2025 पर्यंत थकीत वेतन मिळालं नाही तर 5 मे पासून रुग्णवाहिका सेवा बंद ठेवण्याचा निर्णय 102 रुग्णवाहिका चालकांनी घेतला आहे.

जर या रुग्णवाहिकेची सेवा बंद पडली तर गरोदर माता आणि प्रसूती झालेल्या माता तसेच लहान बालकांची फरफट होणार आहे.

महिला सक्षमीकरणासाठी स्मिता अजमेरा यांना इंडो युरोपियन एक्सेलंसी महाराष्ट्रीयन पुरस्कार

उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी महिलांसाठी काम करणाऱ्या आणि त्यांना शिक्षणाचा मुळ प्रवाहात आणून महिला सक्षमीकरण करणाऱ्या वेस्ट खान्देश बघिणी सेवा मंडळाचे अध्यक्ष स्मिता अजमेरा यांना इंडो युरोपियन एक्सेलंसी हा आंतरराष्ट्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे नुकताच मुंबई येते झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला...

शासकीय सेवेत असलेल्या पतीचा खून, दोन पत्नीचे उपोषण

शासकीय सेवेत कर्तव्य बजावत असताना हिंगोलीत एका कृषी सहाय्यकासह तलाठ्याचा निर्घृण खून करण्यात आल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनेत पोलीस योग्य तपास करत नसल्याने आरोपी अद्यापही फरार आहे दरम्यान याच आरोपींना पोलिसांनी अटक करण्यासाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालया पुढे मृत कृषी सहाय्यक राजेश कोल्हाळ यांच्या पत्नीने आमरण उपोषण सुरू केले आहे तर तलाठी संतोष पवार यांच्या पत्नीने देखील हिंगोली जिल्हा पोलीस दलावर गंभीर आरोप करत पोलीस गुन्ह्याचा योग्य तपास करत नसल्याचा आरोप केला आहे, धक्कादायक म्हणजे कृषी सहाय्यकाचा खून करणारा आरोपी निष्पन्न झाला आहे मात्र वर्षभरापासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार होत असल्याचं पुढे आला आहे त्यामुळे या गुन्ह्याचा तपास गृह मंत्रालयाने विशेष शाखेकडे द्यावा अशी मागणी देखील या कुटुंबीयांनी केली आहे

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

"माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर जिल्ह्याची मोठी आणि असून त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

एफआरपी वाढीचे भाजपकडून पंढरपुरात पेढे वाटून स्वागत

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार्या एफ आरपीचे भाजपा किसान मोर्चाने स्वागत केले आहे. केंद्र सरकारने ऊस दराच्या एफ आरपीत प्रति टन 150 रूपयांची वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरी येथे पेढे वाटून स्वागत केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ऊसाला किमान हमीभाव प्रतिटन 3 हजार 550 रूपये इतका मिळणार आहे. सरकारने साखरेच्या खरेदी दरात वाढ करावी अशी मागणी ही हळणवर यांनी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्या नंतरही भोर तालुक्यातील बनेश्वर येथील रस्त्याचे काम सुरू नाही

पीएमआरडीए कडून अद्याप कामाला सुरुवात नाही

टेंडर प्रोसेसिंग सुरू असल्याने विलंब

बनेश्वर येथील ७०० मीटर रस्तासाठी सुप्रिया सुळे यानी केले होते उपोषण

पीएमआरडीए कडून सुप्रिया सुळे यांना २ मे म्हणजे आजपासून कामाला सुरुवात करू असे दिले होते लेखी आश्वासन

मात्र पीएमआरडीए च्या दिरंगाईमुळे आज ही रस्त्याचे काम सुरू नाही

सुप्रिया सुळे यांच्या उपोषणाला पीएमआरडीए ने देखील गांभीर्याने घेतले नाही का असा प्रश्न विचारला जात आहे

Beed: बीड वनपरीमंडळ अंतर्गत नागझरी जगातील डोंगराला आग

बीडच्या नागझरी येथील वन विभागाच्या डोंगराला अचानक आग लागली आहे

या अचानक लागलेल्या आगीमुळे वन विभागाकडून डोंगर परिसरामध्ये छोटी मोठी झाड लावण्यात आली होती

या भीषण आगीमुळे झाडे जळून खाक झाले असून त्याचबरोबर काही वन्य प्राण्यांची यामध्ये मोठी हानी होऊ शकते अशी शंका वर्तवली जात आहे

ही आग विझवण्यासाठी गेल्या दोन तासापासून शर्तीचे प्रयत्न चालू आहेत.

ही आग विजवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी हनुमंत वायभट,दशरथ गुजर, विलास नवले, शंकर शिंदे, मधुकर नैराळे,बबन पाव्हणे, गौतम वीर,बडगे चंद्रकांत, मेटे महेश, अकबर शेख, परमेश्वर पाव्हणे, परमेश्वर नाईक,शहादेव चव्हाण, बळीराम चव्हाण,संदिप पवार, मधूकर वायभट, लक्ष्मण जाधव, बळीराम चव्हाण आहेत..

Jalgaon : जळगाव गिरणाचे चौथे आवर्तन केवळ पिण्यासाठी मागणीनुसार जिल्हाधिकारी घेणार निर्णय

जळगाव जिल्ह्यातील हतूनर, गिरणा आणि वाघूर या मोठ्चा, १४ मध्यम आणि ०६ लघु प्रकल्पात सरासरी ३९.३७ टक्के उपयुक्त जेलसाठा शिल्लक आहे.

हतनूर आणि गिरणा प्रकल्पातून सिंचनासह पेयजलाचे तीन आवर्तन देण्यात आले आहेत. तसेच गिरणा प्रकल्पातून चार आवर्तन पेयजलाचे शिल्लक आहेत.

यापैकी फक्त गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी चौथे आवर्तन मागणीनुसार येत्या काही दिवसात लवकरच सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तापमानाचा पारा कमालीचा वाढला असल्याने जलसाठ्यात बाष्पीभवनामुळे घट होत आहे.

Latur: लातूर जिल्ह्यातील रुग्णांना जिल्हाधिकारी कार्यालयातच मिळणार मदत

राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळावं.

याकरिता, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले होते..

यानुसार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे..

यामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लागणारी मदत मिळणार आहे...

Pandharpur: पंढरपूरच्या आषाढी वारीचे लागले सगळ्यांना वेध

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

देहूतून १८ जूनला संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान तर आळंदीतून १९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

दोन्ही सस्थानकडून पालख्यांचे वेळापत्रक घोषित

धाराशिव शहरातील भोगावती नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते धाराशिव शहरातील भोगावती नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय.

नगर परिषद धाराशिव, जलसंधारण विभाग,टाटा मोटर्स व नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून धाराशिव शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीतील गाळ काढण्यात येणार आहे

.नदीतील गाळ काढल्याने भविष्यात नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

Buldhana: पाणी आडवा, पाणी जिरवा; झाडे तोडू नका, होईल नाश, विद्यार्थ्यांनी दिला संदेश

खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव व लोणी गुरव येथे कृषी विभागातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प - २ अंतर्गत प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांची प्रभातफेरी, मशालफेरी व शिवारफेरी काढण्यात आली. पाणी अडवा, पाणी जिरवा ... तसेच झाडे तोडू नका होईल नाश असा संदेश या प्रभातफेरी मधून देण्यात आलाय...

Roha: रोह्यातील घरफोडी प्रकरणी 4 जणांना अटक

रोहा शहरात एकाच रात्री तीन इमारतींमध्ये घरफोडीच्या सहा घटना समोर आल्या होत्या. या घटनेने पोलिसांची झोप उडाली होती. या चोरी- घरफोडी प्रकरणी पोलिसांनी 100 हून अधिक सीसीटीव्ही तपासत एका महिलेसह 4 जणांना अटक केली आहे. यात चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाचाही समावेश आहे.

Maharashtra Weather: विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पारा ४० अंशाच्या वर

राज्यातील सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात

अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद

सूर्यदेवाचा प्रकोप पुण्यात सुरूच! पुणे शहरच पारा ४३ अंशावर

विदर्भातील जिल्ह्यांबाबत अकोला पाठोपाठ अमरावती ४२.८, वाशिम ४२.६, वर्धा ४२.१, चंद्रपूर ४१.८, नागपूर आणि यवतमाळ ४१.६ तर बुलढाण्यात ४०.८ अंश इतक्या तापमानाची नोंद

मराठवाड्यातील बीड मध्ये ४२.९, धाराशिव ४२.६, छत्रपती संभाजीनगर ४२ तर परभणी मध्ये ४१.६ अंश तापमानाची नोंद

मध्य महाराष्ट्राचा विचार करता सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव मध्ये, जळगावात ४४ अंश तापमान

सोलापूर मध्ये ४४.१, पुणे ४३, मालेगाव मध्ये ४२.२, सातारा ४१.२ तर नाशिक मध्ये ४० अंश तापमानाची नोंद

Pune News: फुगडी खेळत, ढोल ताशाच्या गजरात जातीय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत

केंद्र सरकार ने जातीय जनगणना केली जाणार असल्याच्या निर्णयानंतर अनेक ठिकाणी या निर्णयाच्या स्वागतार्थ जल्लोष केल्याचं पाहायला मिळतंय.

पुण्यात सुद्धा फुले वाड्यात सर्व फुले प्रेमी आणि ओबीसी रणसंग्राम तर्फे जातनिहाय जनगणना घोषणेचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

फुले वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून यावेळी पुरुषांनी फुगडी खेळत या निर्णयाचे स्वागत केलं.

ढोल ताशा वाजवत आणि एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Pune Free Show: पुण्यात महिलांसाठी फुले चित्रपटाचा मोफत शो

ज्या पुण्यात फुले सिनेमातील काही दृश्यांना विरोध झाला होता त्याच पुण्यात महिलांसाठी या चित्रपटाचे मोफत शो आयोजित केला गेला.

युवाशक्ती सोशल फाउंडेशन व समीर उत्तरकर यांच्या वतीने पुण्यात महिलांसाठी फुले चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन काल १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते.

या शोच्या माध्यमातून सर्वांपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार पोहोचावेत या उद्देशानेच या मोफत शोचे आयोजन केले होते असं आयोजकांकडून सांगण्यात आलं.

हा मोफत शो पाहण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला...

Ahilyanagar: अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका बलभीमराव जगताप यांचे दुःखद निधन

पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये सुरू होते उपचार

अंतिम पार्थिव दर्शन-

दुपारी २ वा.

(भवानीनगर - निवासस्थानी, अहिल्यानगर)

अंत्यविधी -

दुपारी ४ वा.

(अमरधाम, अहिल्यानगर)

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील होते

मध्यवर्ती बँकेचा शेतकऱ्यांना दिलासा, शून्य टक्के व्याजदराने करणार वसुली

शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जाचे मुदतीत भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आता कुठलेही व्याज न आकारता शून्य टक्के व्याजदराने पीक कर्जाची वसुली करण्याचा निर्णय यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलाय या संदर्भात सर्व शाखांना निर्देश देणारे पत्र पाठवण्यात आले असून शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केल्या जात आहे.

चिखली तालुक्यात विनपरवानगी प्रचंड वृक्षतोड, वन विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष

चिखली तालुक्यात अविध पणे शेकडो वर्षांपूर्वीचे शेकडो वृक्ष कुठलीही परवानगी न घेता तोडण्यात आली आहे...

ही तोडलेली झाडे चिखली शहरात एका निर्जंनस्थळी साठवून ठेवण्यात आली आहेत..

ही झाडे तोडण्यासाठी वन विभगगाची परवानगी घेणे आवश्यक असताना तिथे परवानगी न घेता असंख्य वृक्ष तोडली जात आहेत..

याची तक्रार सुद्धा वन विभागाकडे करण्यात आली आहेत मात्र वन विभागाने त्याची साधी चौकशी सुद्धा केली नाही..

त्यामुळे पाणी कुठेतरी मूर्तंय असा संशय व्यक्त केला जात आहे..

चिखली येथील जी झाडे तोडल्या गेली त्याची वन विभागाने तातडीने चौकशी करावी तसेच ही वृक्ष तोडण्याऱ्यावर व कोणाच्या सांगनमताने तोडल्या गेली याची चौकशी करून संबधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे

यवतमाळ घाटंजी तालुक्यातील तिवसाळा ग्रामपंचायतीला झेंडा उतरविण्याचा विसर, राष्ट्रध्वजाचा केला अवमान

1 मे महाराष्ट्र दिनी तिवसाळा ग्रामपंचायत मध्ये रात्री उशिरा पर्यत राष्ट्रध्वज उतरविला गेला नाही,त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे..

Yavatmal News: यवतमाळ पालिकेकडे थकले 30 कोटीची पाणीपट्टी

यवतमाळ पालिकेच्या वतीने वापर करण्यात येणाऱ्या जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या थकबाकी तब्बल 30 कोटी रुपये इतकी झाली असून या थकबाकीच्या वसुलीसाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक थेट पालिका कार्यालयात वसुलीसाठी धडक देत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन थकबाकी भरणा करण्याची मागणी केली आहे.

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील काम बंद आंदोलनामुळे गावगाड्यातील कामे ठप्प

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेनेच्या वतीने दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केल्याने यवतमाळ जिल्ह्यातील गावगाड्यातील कामे सध्या ठप्प झाली आहेत.

राजा शिवछत्रपती परिवारच्या वतीनं गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम

महाराष्ट्रातील किल्ल्यांचे संरक्षण आणि स्वच्छता संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवारच्या वतीने गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.

ही संस्था महाराष्ट्रात ३२ जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून महिन्यातील एक रविवार महाराज्यांच्या प्रत्येक गडकिल्यावर स्वच्छता संवर्धन मोहीम राबवण्यात येते..

राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून यशवंत गड, जयगड, रत्नदुर्ग, पुर्णगड, आंबोळगड, गोविंदगड, सुवर्णदुर्ग, किल्ले सिंधुदूर्ग अशा विविध किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम आखण्यात आली होती.

मोहीमेसाठी जयगड, रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, लांजा, सांगली, गोवा, सावंतवाडी येथून परिवाराचे सदस्य दाखल झाले होते.

Badlapur: बदलापूर शेकडो चिमुकल्यांनी गायलं महाराष्ट्र गीत

बदलापूरात महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून 1200 चिमुकल्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन महाराष्ट्र दिन साजरा केला,

यावेळी वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने छावा चित्रपटाचा खुला शो ही आयोजित केला होता,

छत्रपती संभाजी महाराजकी जय अशा घोषणा देत छत्रपती संभाजी राजांची छावा चित्रपटातील शौर्यगाथा या चिमुकल्यांनी अनुभवली,

सहा ते दहा वयोगटातील मुलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं

या कार्यक्रमाला चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,

तसेच चिमुकल्यांसाठी पुढील सात दिवस उन्हाळी मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं असून त्यात जुन्या काळातील खेळ, चित्रकला, वृक्षारोपण, मैदानी खेळ, योगा, नृत्य नृत्यकला चिमुकल्यांना शिकवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक वरूण म्हात्रे यांनी दिली.

शीळींब गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

मावळच्या शिळींब गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते  महापूजा करण्यात आले...

लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या या भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.

दरम्यान यावेळी संपूर्ण गावातून कळस मिरवणूक, काढण्यात आली या कळस मिरवणुकीला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.

काल्याच कीर्तनाची सेवा ह भ प. शिवा महाराज बावस्कर यांच्या हस्ते करण्यात आली आहे. किर्तन ऐकण्यासाठी मावळच्या पंचक्रोशीतून भाविक आले होते.

महाप्रसादांनी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.....

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.