जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवरील जलविद्युत केंद्र असलेल्या बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहे. या धरणातून सध्या पाण्याचा एकही थेंब पाकिस्तानसाठी सोडला जात नाही. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.
Purandhar Airport : पुरंदर नियाेजित आंतरराष्ट्रीय विमानतळ : पोलिसांवर दगडफेकप्रकरणी 400 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखलपुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनास पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. आंदोलकांवर शनिवारी (ता. 03 मे) पोलिसांनी लाठीहल्ला केला. तसेच पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी सुमारे 300 ते 400 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चार शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.
Ajit Pawar : लाडक्या बहिणींचे पैसे आले का? अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरमधील महिलांना प्रश्नछत्रपती संभाजीनगर येथील पाडेगाव परिसरातील वनस्पती उद्यानाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. या वेळी उद्यानातील विविध झाडांची उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून आवर्जून माहिती घेतली. या उद्यानात मजुरी करणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे आले का सगळ्यांना अशी विचारणा केली. आठवडाभरापूर्वीच तुमचे या महिन्यांचे पैसे पाठवले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Ram Naik : प्रकृतीचे कारण देत राम नाईकांचा राजीनामाभाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मत्सोद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्याचे मत्सोउद्योग धोरण ठरविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीच्या अध्यक्षपदाचे काम प्रकृती अस्वास्थामुळे करू शकत नाही हे कारण देऊन नाईक यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
Ind Vs Pak : भारताकडून पाकिस्तानची पाणीकोंडीभारताने पाकिस्तानविरोधात आणखी एक कडक पाऊल उचलेले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. सिंधू पाणी वाटप करार भारताने रद्द केला आहे. तसेच भारताच्या हवाई क्षेत्रातून पाकिस्तानच्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता बागलीहार धरणातून चिनाब नदीचे पाणी थांबविण्यात आले आहे, त्यामुळे भारताकडून पाकिस्तानची ‘पाणीकोंडी’ करण्यात येत आहे.
Bjp News : राड्यात तीन ते चार जण जखमीडोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर परिसरात भाजपच्या माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या आजीमाजी समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. तलवारी, लोखंडी रॉड, दगडांनी दोन्ही गटाकडून मारहाण करण्यात आली आहे. या राड्यात तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी विष्णू नगर पोलीसानी दोन्ही गटांनी दिलेला तक्रारीनुसार दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करत तीन जणांना अटक केली आहेत.
Sanjay Shirsat : दलित आणि आदिवासींचा निधी लाडकी बहिण योजनेला वळवल्यामुळे व्यक्त केला संतापसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठांवर रिपाइं नेते सचिन खरात यांनी टीका केली आहे. दलित आणि आदिवासींचा निधी लाडकी बहिण योजनेला वळवल्यामुळं सचिन खरात संतापले. संजय शिरसाठांना मंत्रीपद सांभाळता येत नसेल, तर राजीनामा द्या, अशी मागणी सचिन खरातांनी केलीय आहे.
Sanjay Shirsat : मंत्री शिरसाट यांनी आपल्याच सरकारला घेरलेविधानसभा निवडणुकीच्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड जारी केला. त्यामध्ये 100 दिवसांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अन् मंत्री आदिती तटकरे यांना पहिला क्रमांक मिळाला आहे. त्यांना 100 पैकी 80 टक्के गुण मिळाले आहे. त्यावरुन शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्याच सरकारला घेरले आहे. आमच्या खात्याचा निधी वर्ग करण्यात आला. मग त्यांचा नंबर वन आला. आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाही तर आमचा उल्लेख 100 दिवसांच्या कार्यक्रमात कसा होणार? असा प्रश्न संजय शिरसाट यांनी विचारला आहे.
HSC Result 2025 : प्रतीक्षा संपली ! बारावीचा उद्या निकालबारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बारावीचा निकाल उद्या ५ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने नुकतीच तशी घोषणा केली आहे. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहाता येईल.
Karuna Sharma : धनंजय मुंडेंकडून मला जीवे मारण्याची धमकी : करुणा शर्मांचा गंभीर आरोपधनंजय मुंडे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. कोर्टात त्यांनी तशी लेखी तक्रार केली आहे. तुझे 18 तुकडे करणार अशी धमकी फोनद्वारे आपल्याला धनंजय मुंडे यांनी दिली.12 दिवसांपूर्वी मला धमकी देण्यात आली आहे. असा गंभीर आरोप करुणा मुंडे-शर्मा यांनी केला आहे. अजून मी मुंडे कुटुंबाबद्दल 50 टक्के पण तोंड उघडले नाही. उघडायला लाऊ नका असंही करुणा मुंडे म्हणाल्या.
Rahul Gandhi : राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृतराहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर साधुसंतांसह अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या भूमिकेने एकच खळबळ उडाली आहे.
15 मे पर्यंत लागणार दहावी-बारावीचा निकालराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परिक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून 15 मे पर्यंत निकला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत सद्भावना यात्रेला प्रारंभप्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या परभणीत पोखरणी ते परभणी सद्भावना यात्रेला सुरुवात करण्यात आली. या यात्रेमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी नेते कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. आज दिवसभरात 20 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा आज सायंकाळी परभणीत पोहोचणार आहे
India imposes complete ban on imports from Pakistan : भारताकडून पाकिस्तानवर संपूर्ण आयात बंदीपहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तासोबत होणाऱ्या सर्व प्रकरचा व्यापार भारताने थांबवला आहे. तसेच पाकिस्तानवर संपूर्ण आयातबंदी लागू केली.
अजित पवार अहिल्यानगरमध्ये संग्राम जगतापांच्या भेटीलाराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या वडिल माजी आमदार अरुण काका यांचे निधन दोन दिवसांपूर्वी झाले. संग्राम जगताप यांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहेत. जगताप कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अजित पवार संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.
Maharashtra ST Labor Union : उद्यापासून ST कामगार संघटनेचं दोन दिवसीय अधिवेशनउद्यापासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं 57 वे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन सुरू होणार आहे. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाला 50 हजार एसटी कर्मचारी संघटनेतील कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षांनी दिली आहे.
Shivendraraje Bhosale : पिढीला चित्रपटातून इतिहास कळतोय याचं दु:खआजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास चित्रपटातून कळतोय ही बाब दुर्दैवी असून याचं आम्हाला दुःख वाटतं, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. सांगलीत शिवोत्सव 2025 या सोहळ्यात बोलताना त्यानी हे वक्तव्य केलं. काही महिन्यापूर्वी छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नवीन पीढीला छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम कळला ही एकप्रकारे खेदाची बाब असल्याचंही ते म्हणाले.
Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील हल्ल्यानंतर देशभरात अलर्टपहलगाम हल्ल्यानंतर देशभरात अलर्ट देण्यात आला होता. अशातच जगभरातील भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानला साई मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. या धमकीनंतर साई संस्थानसह पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे.
Pahalgam Terror Attack : ओमर अब्दुल्ला यांनी घेतली PM मोदींची भेट घेतलीजम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेली ही बैठीक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास बैठक सुरु होती. या बैठकीत जम्मू काश्मीरमधील सुरक्षेसंदर्भातील परिस्थीतसह विविध मुद्यांवर चर्चा झाली.
Vikhe Patil Meet Amit Shah : राधाकृष्ण विखे पाटील पुत्रासह अमित शहांच्या भेटीलाभाजप नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी अमित शाह यांना निमंत्रित करण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.